Parliament Session 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Parliament Winter Session 2024 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांचा गदारोळ सुरूच; अदानी प्रकरणावरून संसद परिसरात निदर्शने

Opposition MPs Protest On Adani Issue : २५ नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. मात्र अदानी प्रकरणावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा अदानी समूहावरील आरोप आणि संभाळ हिंसाचारासह विविध मुद्द्यांवरून गदारोळातच गेला. आज (ता.३) देखील याच मुद्द्यावरून विरोधी इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली. यावेळी मात्र समाजवादी पक्ष संभल हिंसाचारावर चर्चेची मागणी करत होता. सपच्या खासदारांनी काँग्रेच्या या निदर्शनापासून फारकत घेतल्याचे दिसून आले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाच्या सुरूवातीलाच विरोधी इंडिया आघातील खासदारांनी अदानी प्रकरणावरून वॉकआऊट केला. यानंतर त्यांनी संसदेच आवारात निदर्शने केली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक खासदार उपस्थित होते.

संसदेचे कामकाज सुरू

अदानी समूहावरील आरोप आणि संभाळ हिंसाचारासह विविध मुद्द्यांवरून सभागृहाबाहेर निदर्शने केल्यानंतर आता संसदेचे कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. संसदेत प्रश्नत्तोरांचा तास सुरू झाला आहे. संसदेत होत असल्याच्या गदारोळावरून काल (ता.२) ​​लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यात संसदेतील संघर्ष संपवण्यासह चर्चा करण्याचे मान्य करण्यात आले होते.

काँग्रेसची भूमीका काय?

काँग्रेसचा आग्रह हा अधिवेशनात अदानी प्रकरणावरून भाजपला घेरण्याचा आहे. मात्र तृणमूल काँग्रेस महागाई, बेरोजगारी, शेतकरी, खते, विरोधी राज्यांना दिल्या जाणाऱ्या निधीतील कपात आणि मणिपूर यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची आहे. सपाही काँग्रेसच्या भूमिकेबरोबर नसून शेतकरी, संभळ आणि मणिपूर या मुद्द्यांवरही चर्चेसाठी आग्रही आहे.

सपासाठी शेतकरी अदानीपेक्षा मोठा मुद्दा

सपा खासदारांनी आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन शेतकरी, संभळ आणि मणिपूर या मुद्द्यांवर चर्चेची विनंती केली. सपा खासदार धर्मेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार, अदानीचा मुद्दा संभाळइतका मोठा असून आमच्यासाठी शेतकरी हा अदानीपेक्षा मोठा मुद्दा आहे.

चौधरी यांच्या विधानावरून वाद

दरम्यान, काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांच्या एका विधानावरून वाद निर्माण झाला आहे. त्यांनी, जनतेने आम्हाला निवडून संसदेत पाठवले असून सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे असा आमचा प्रयत्न आहे. तशी आमची देखील इच्छा आहे. आम्ही आमच्या मतदारांचे प्रश्न येथे मांडण्यासाठी आलो आहोत. पण आता सरकारलाच सभागृह चालवायचे नाही असे दिसत आहे. यात षड्यंत्र काय आहे, हे सर्वांना समजले आहे.

तसेच चौधरी यांनी यावेळी सभागृहाचे कामकाज चालवणे सत्ताधाऱ्यांचे काम असून ते विरोधकांचे नाही. ते लायक असतील तर ठिक अन्यथा या नालायकांनी सभागृहातून जावं, असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानावरून आता सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू विरोधकांच्या गदारोळावर प्रतिक्रिया दिली. रिजिजू म्हणाले, संसदेचे कामकाज देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तसे न होणे हे देशासह विरोधी पक्षांसाठीही हानिकारक आहे. आमच्याकडे बहुमत आहे. तरीदेखील आम्हाला चर्चेशिवाय विधेयके मंजूर करायची नाहीत. तर संसद विस्कळीत करणे हे देशाच्या आणि त्यांच्या हिताचे नसल्याचे अनेक विरोधी खासदारांना वाटत असल्याचेही केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bank Crop Loan: बॅंकांनी पीककर्ज प्रकरणांत सकारात्मकता ठेवावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील

Maharashtra Sugar Industry: हंगामाच्या ५० दिवसांनंतरही सात कारखान्यांचे दरावर मौन

MPKV MoU Signed: कृषी विद्यापीठाचा ‘कार्डियन करेक्ट’शी करार

Honey Village Scheme: ‘मधाचे गाव’ योजना देणार रोजगाराचा गोडवा

Devendra Fadnavis BJP Victory: भाकीत खरं ठरलं! भाजपचा नवा रेकॉर्ड, किती जागा जिंकल्या?; फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

SCROLL FOR NEXT