Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

kolhapur Water News : कोल्हापूरकर पाणी जपून वापरा, राधानगरी धरणात थोडकंच पाणी शिल्लक

Monsoon Update In Maharashtra : राज्यात मॉन्सून लवकरच दाखल होणार अशी चर्चा असली तरी काही जिल्ह्यात पाणी टंचाई भासू लागली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासू शेतीसाठी उपसाबंदी लागू करण्यात येत आहे.

Team Agrowon

Water Shortage : राज्यात मॉन्सून लवकरच दाखल होणार अशी चर्चा असली तरी काही जिल्ह्यात पाणी टंचाई भासू लागली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासू शेतीसाठी उपसाबंदी लागू करण्यात येत आहे.

याचबरोबर आता कोल्हापूर शहराला दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. याबाबत कोल्हापूर महापालिकेचे जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी माहिती दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेल्या राधानगरी धरणात पाणीसाठा कमी झाला आहे. याचबरोबर मागच्या दोन महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

यावर उपाययोजना म्हणून पाटबंधारे विभागाकडून कोल्हापूरला पाणीपुरवठ्यासाठी योग्य प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान पाऊस लांबण्याची शक्यता गृहीत धरून कोल्हापूर शहरात (ता. १५) दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.

कोल्हापूर शहरालगत असलेल्या पंचगंगा नदीत असलेल्या शिंगणापूर बंधाऱ्यातून घेण्यात येतो. परंतु यंदा पाऊस कमी झाल्याने शिंगणापूर बंधाऱ्याची पाणी पातळी ५३६.५० मीटर आहे. तर बालिंगा येथे भोगावतीची पाणी पातळी १७.६४ फूट आहे.

दरम्यान शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी उपसा केंद्रे सुरळीत सुरू राहतील इतकी पाणी पातळी सध्या आहे परंतु पुढच्या काळात पाऊस नाही झाल्यास कोल्हापुरात परिस्थीती बिकट होण्याची शक्यता आहे.

या बंधाऱ्यात असणारे पाणी फक्त १० दिवस पुरण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढच्या काळात पाऊस न झाल्यास बिकट परिस्थिती ओढावू शकते, यासाठी पाटबंधारे विभाग आणि कोल्हापूर महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सध्या राधानगरी धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गाच्या अंदाजानुसार २२ ते २५ दिवस पाणी मिळेल एवढा साठा आहे. अशी माहिती सरनोबत यांनी दिली.

कोल्हापुरात ५१ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा

दरम्यान, कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या वतीने कसबा बावडा फिल्टर हाऊसमधून २४ ठिकाणी, तर कळंबा फिल्टर हाऊसमधून २७ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

शिवाजी पेठ, सानेगुरुजी वसाहत, सुर्वेनगर, तपोवन परिसर, नाळे कॉलनी, क्रशर चौक, राजेंद्रनगर, एस. एस. सी. बोर्ड परिसर, सुभाषनगर, टिंबर मार्केट, राजाराम चौक, विचारे माळ, टेंबलाईवाडी, राजारामपुरी, नागाळा पार्क, ताराबाई पार्क आदीसह इतरत्र टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Harvesting: जुन्नर परिसराला विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याचे आकर्षण!

Sugarcane Cultivation: आतापर्यंत आडसाली ऊसाची ६७ हजार हेक्टरवर लागवड

Natural Disaster Mangement: नियोजनात्मक चुका, त्रुटींमुळे नैसर्गिक आपत्ती

Sugarcane Price Protest: ऊस दर प्रश्नी माजलगावात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Agrowon Agri Expo: आधुनिक शेतीतल्या नव्या संधींसाठी ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

SCROLL FOR NEXT