Ethanol Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Production : इथेनॉल उत्पादनाबाबत पुण्यात मंथन; राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष्यांची उपस्थिती

Pune Event : इथेनॉल उत्पादनाला अधिक चालना मिळण्यासाठी कोणती पाऊले उचलावीत यावर विचार करण्यासाठी देशभरातील सहकार क्षेत्रात काम करणारे अधिकारी व तज्ज्ञांच्या शुक्रवारी (ता. १७) येथे झालेल्या बैठकीत मंथन करण्यात आले.

Team Agrowon

Pune News : इथेनॉल उत्पादनाला अधिक चालना मिळण्यासाठी कोणती पाऊले उचलावीत यावर विचार करण्यासाठी देशभरातील सहकार क्षेत्रात काम करणारे अधिकारी व तज्ज्ञांच्या शुक्रवारी (ता. १७) येथे झालेल्या बैठकीत मंथन करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील होते.

बैठकीस देशभरातील सहकारी साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य साखर संघांचे व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, केंद्रीय सहकारिता मंत्रालयाचे संचालक डी. के. वर्मा, एन.सी.डी.सी.चे संचालक गिरराज अग्निहोत्री, महाराष्ट्राचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आदी उपस्थित होते.

सहकार क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्रीय सहकारिता मंत्रालयाने आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करण्याचा आणि त्याद्वारे अन्न - धान्य विशेषतः मक्यापासून इथेनॉलचे उत्पादन केल्यास हे प्रकल्प वर्षभर चालतील आणि त्यातून कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असे सुचविले होते.

आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधार करण्यासाठी त्यांना अर्थ साह्य मिळावे यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने पुढाकार घेतला व त्यास भारत सरकारकडून चांगला प्रतिसादही मिळाला आहे. नॅशनल कॉऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने या कामासाठी व्याज सवलतीत मुदत कर्ज देण्याचे मान्य केले आहे. हा केंद्र सरकारचा एक प्रकारे ‘धडक कार्यक्रम’ असून त्याचा लाभ उसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन करणाऱ्या आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करून कसा घेता येईल याबद्दल विस्ताराने चर्चा झाली.

देशातील सहकारी साखर कारखान्यांची संख्या २०० असून त्यापैकी ६३ कारखान्यांत आसवनी प्रकल्पातून इंधनासाठी लागणाऱ्या इथेनॉलचे उत्पादन होते पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कारण अशा प्रकल्पांची उत्पादन क्षमता ५५ ते ६० टक्के आहे. जे खासगी कारखान्यांतील अशा प्रकल्पांच्या तुलनेत फार कमी पडते. सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम साधारणपणे मार्च -एप्रिल मध्ये संपतो. त्यानंतर इथेनॉलचे उत्पादन चालू ठेवायचे असेल तर ते धान्यावर चालते. वास्तविक पाहता इथेनॉल उत्पादन बारमाही करता येण्यासारखे आहे आणि त्याचा आर्थिक फायदा कारखान्यांना घेता येतो.

मक्यामुळे इथेनॉल उत्पादनाला गती येईल

मका हे कमी पाण्यात येणारे, वर्षातून दोन हंगामात घेता येणारे पीक आहे. त्याची किमान आधारभूत किंमतही सरकारने यावर्षी वाढविली आहे. त्याचा लाभ घेऊन सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्या सध्याच्या आसवनी प्रकल्पांचे मल्टिफीडमध्ये रूपांतर केल्यास इथेनॉल उत्पादनाला गती येईल. ऑईल मार्केटिंग कंपन्या याबाबत साखर कारखान्यांशी दीर्घ मुदतीचे करार करण्याबाबत अनुकूल आहेत. तसेच तयार इथेनॉलची खरेदी सहकारी आसवनींकडून प्रथम प्राधान्याने करण्याचे आदेशही जारी झाले आहेत. याबाबत ही अनेक तज्ज्ञांनी चर्चा केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT