Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Satara Water Storage : सातारा जिल्ह्यातील धरणांत ४०.८३ टीएमसी पाणीसाठा

Water Stock : जिल्ह्यात कधी नव्हे ते मेमध्ये मुसळसार पाऊस झाला. यामुळे धरणसाठ्यात बऱ्यापैकी भर पडली. यावर्षी जानेवारीपासूनच अनेक धरणांतील पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले होते.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात मेपासून सुरू झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यातील धरणातही पाणी पातळीत होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत ४०.८३ टीएमसी म्हणजेच २५.९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. माण, खटाव, फलटण तालुक्यात जोरदार पावसामुळे येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी चार प्रकल्प मे महिन्यांतच शंभर टक्के भरले आहेत.

जिल्ह्यात कधी नव्हे ते मेमध्ये मुसळसार पाऊस झाला. यामुळे धरणसाठ्यात बऱ्यापैकी भर पडली. यावर्षी जानेवारीपासूनच अनेक धरणांतील पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले होते. पाण्याची वितरण व्यवस्थित झाल्याने पाणीसाठा शिल्लक होता. त्यातच मे महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळे पाणीसाठी वाढण्यास मदत झाली आहे.

राज्याच्या वीज निर्मितीच्या दुष्टिने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात २२.८५० टीएमसी म्हणजेच २१.७१ टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने पाणी साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. धोम धरणात ५.०६० टीएमसी म्हणजेच ३७.४१ टक्के, धोम-बलकवडी ०.४१० टीएमसी म्हणजेच ७.३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

दुष्काळी तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या उरमोडी धरणात ३.९२० टीएमसी म्हणजेच ३९.३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कण्हेर धरणात ४.१४० टीएमसी म्हणजेच ४०.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तारळी धरणात १.३७० टीएमसी म्हणजेच २३.२ टक्के पाणी शिल्लक आहे.

तसेच येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी, नागेवाडी, मोरणा, उत्तरमांड, महू, हातगेघर, वांग या मध्यम प्रकल्पात ३.०८ टीएमसी (३५.२१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. दुष्काळी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने मे महिन्यात येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी चार प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामुळे या तालुक्यातील पाणीटंचाई कमी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Vegetables : आरोग्यदायी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व

Manoj Jarange Patil: १० टक्के आरक्षण नको, कायमस्वरूपी आणि हक्काचे आरक्षण हवे; मनोज जरांगे पाटील

Agriculture Department : कृषी विभाग रोज पन्नास हजार शेतकऱ्यांच्या संपर्कात

Reshim Sheti Success : रेशीम शेतीतून विकासाकडे वाटचाल

Turmeric Futures Ban : हळदीच्या वायदेबंदीची मागणी कितपत योग्य?

SCROLL FOR NEXT