Electricity Supply Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : प्रलंबित २०४४ वीज जोडण्यांचे काम मार्चअखेर

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील प्रलंबित वीज जोडण्यांचा प्रश्‍न लवकर निकाली लागावा, यासाठी संघटना पाठपुरावा करत आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : महावितरणतर्फे (Mahavitaran) कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील प्रलंबित २०४४ वीज जोडण्यांचे (Electricity Connection) काम ३१ मार्च २०२३ अखेर करण्यात येणार आहेत. तशा सूचना कार्यकारी संचालक अरविंद भादीकर यांनी केली आहे. त्यासाठी राज्य पातळीवर पंधराशे कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे.

महावितरणने शेती पंपांच्या वीज जोडण्यांचा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी अग्रक्रम दिला आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ४ हजार ८८७ शेती पंप ग्राहकांनी पाच वर्षांहून अधिक काळ एकही वीज बिल भरलेले नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे.

या थकबाकीचा आकडा ७५ कोटी रुपये इतका आहे. या स्थितीत शेती पंपांच्या वीज जोडण्यांचा प्रश्‍न चर्चेत आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील प्रलंबित वीज जोडण्यांचा प्रश्‍न लवकर निकाली लागावा, यासाठी संघटना पाठपुरावा करत आहेत. त्यातच वीज मीटरची दरुस्ती न झाल्याने बिल का पाठवले जाते, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

प्रलंबित वीज जोडण्या तत्काळ करा, अशी मागणीही केली जात आहे. दरम्यान, शेती पंपांना दिवसा वीज मिळावी, या हेतूने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना राबवली जात आहे.

पहिल्या टप्प्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३८५ मेगावॅटचा शेतीचा वीज वापर सौरऊर्जा प्रकल्पांद्वारे कार्यान्वित करण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून गतीने पूर्ण करावी, असेही भादीकर यांनी स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT