Nashik News: नाशिक जिल्ह्यात झालेल्या पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीमुळे शेतीपिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी विभागाने १९ मार्च रोजी तयार केलेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण ७०५४.४० हेक्टर क्षेत्राला या अवकाळीचा फटका बसला आहे. यामध्ये ६३ गावांमधील १० हजार ६२२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील मालेगाव आणि सटाणा तालुक्यांत नुकसानीची तीव्रता सर्वाधिक दिसून येत आहे. कांदा व डाळिंब पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे..जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यातर्फे २० मार्च २०२६ रोजी देण्यात आला. अस्मानीच्या तडाख्यात रब्बी हंगामातील पिकांसह बहुवार्षिक फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. बागायत क्षेत्रात सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला असून, कांदा बीजोत्पादन क्षेत्र देखील बाधित झाले आहे. फळपिकांमध्ये सर्वाधिक नुकसान डाळिंबाचे आहे. त्याखालोखाल द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू व मक्याला फटका बसला आहे. भाजीपाला आणि वेलवर्गीय फळांचे नुकसान झाले आहे..Hailstorm Crop Damage: मराठवाड्यात गारपिटीचा साडेअकरा हजार हेक्टरवर फटका.सलग दोन दिवस अस्मानीचा फटका बसला आहे. यापूर्वी १८ मार्च रोजी २४७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान समोर आले आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ५ तालुक्यांमध्ये मुख्यत्वे नुकसान झाले आहे. यामध्ये निफाड तालुक्याचे सर्वाधिक १६५ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. यात गहू (४७ हेक्टर), कांदा (९० हेक्टर) आणि द्राक्ष (१६ हेक्टर) बागांचा समावेश आहे. येथे ३९६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दिंडोरी, कळवण, सिन्नर व देवळा तालुक्यात नुकसान समोर आले होते. यापूर्वी ५५९ शेतकरी बाधित झाले होते..Unseasonal Rain: पावसाच्या तडाख्याने रब्बीचे क्षेत्र गारद.मालेगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसानजिल्ह्यात सर्वाधिक नुकसान मालेगाव तालुक्यात झाले असून येथील १६ गावांमधील ४१७४ शेतकरी बाधित झाले आहेत. तालुक्यात एकूण ३३११ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून यात प्रामुख्याने कांदा १६४६ हेक्टर आणि डाळिंब १२६४ हेक्टर पिकांचा समावेश आहे. बागलाण तालुक्यात ७ गावांमधील १९५६ शेतकऱ्यांचे १६७ हेक्टरवरील नुकसान झाले असून, येथेही कांद्याला १५९८ हेक्टर मोठा फटका बसला आहे.. नांदगाव तालुक्यात १३ गावांमधील १९२३ शेतकऱ्यांना फटका बसला असून, एकूण ८९७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. निफाडमध्ये १६ गावांमधील १३६४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून,एकूण ६२२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने कांदा २९७ आणि द्राक्ष १०३ हेक्टरचा समावेश आहे. सिन्नरमध्ये ११ गावांमधील १२०५ शेतकऱ्यांचे ५५१.४० हेक्टरवरील नुकसान झाले आहे.यात कांदा ३४६ आणि गहू १५८ हेक्टरवर नुकसान आहे..पिकनिहाय नुकसान असे (ता. १९ रोजी)पीक बाधित क्षेत्र (हेक्टर)कांदा ४४८२डाळिंब १३७७गहू ७२०मका ३००द्राक्ष १०९भाजीपाला ५१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.