Farmer Protets Agrowon
ॲग्रो विशेष

Canal Water Protest : पालखेडच्या पाण्यासाठी अर्धनग्न आंदोलन

Palkhed Water for Irrigation : पालखेड डावा कालव्याला यंदा सिंचनाचे रब्बीचे आवर्तन उशिरा सुटल्याची तक्रार शेतकरी संघटनेने यापूर्वीच केली असून पाणी आवर्तन उशिरा सुटण्याची चौकशीचीही मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Team Agrowon

Nashik News : हक्काचे पालखेड डाव्या कालव्याचे पाणी मिळत नसल्याने मंगळवारी (ता.८) देशमाने बुद्रुक व देशमाने खुर्द येथील दोन पाणीवापर सहकारी संस्थांच्या शेतकऱ्यांनी आक्रमक होत थेट पालखेड कालव्यात उतरून अर्धनग्न होत जलसमाधी आंदोलन केले. पालखेड प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. अखेर सायंकाळी या वितरिकांना पाणी सोडल्यावर शेतकरी शांत झाले.

रब्बी हंगामातील कांदा व इतर पीक पाण्याअभावी जळून चालले आहे. तर पालखेड डावा कालव्यातून वेळेत आवर्तन मिळत नसल्याने हतबल झालेल्या देशमाने येथील गोईजल पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष योगेश गांगुर्डे, देशमाने खुर्द छत्रपती पाणी वापर संस्थेचे सागर शिंदे तसेच विनायक वावधाने, रवी गांगुर्डे, कैलास आरगडे, बाबासाहेब आरगडे, दत्तू कदम, सोमनाथ आरगडे, नवनाथ गांगुर्डे, नवनाथ आरगडे, वैभव आरगडे, राजेंद्र आरगडे आदींसह शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.८) पालखेड डावा कालव्यात उतरून आवर्तनाचे पाणी सोडण्यासाठी अर्धनग्न आंदोलन केले.

पालखेड डावा कालव्याला यंदा सिंचनाचे रब्बीचे आवर्तन उशिरा सुटल्याची तक्रार शेतकरी संघटनेने यापूर्वीच केली असून पाणी आवर्तन उशिरा सुटण्याची चौकशीचीही मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. आवर्तन उशिरा सुटल्यामुळे रब्बी हंगामातील पिके जळाली असून या आवर्तनाचा सिंचनाला फायदा होणार नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे.

देशमाने बुद्रुक येथील गोई आणि देशमाने खुर्द येथील संस्थांच्या लाभार्थी शेतकऱ्यांची पिकेही उशिराच्या पाण्यामुळे जळाली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी आज चारी क्र.२१ च्या शीर्ष भागात विंचूर शिवारात जाऊन दुपारी बाराला कालव्यात अर्धनग्न होत जलसमाधी आंदोलन केले. पिके तर पाण्याअभावी हातची गेलेली असताना जनावरांचा चारापाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी तरी चाऱ्यांना पाणी सोडा अशी आर्त हाक या शेतकऱ्यांनी आंदोलन करताना पालखेड पाटबंधारे विभागाला दिली.

चारी क्र.२१ व २५ या ठिकाणी जाणाऱ्या पाट चारीचे गेट देखील कालव्यावर खोलण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला.मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. दुपारी पालखेड प्रशासनाने १० क्यूसेक्सने चारी क्र.२१ ला पाणी सोडल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आवर्तनात मिळणाऱ्या या पाण्याचा फायदा पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांना व्हावा, यासाठी आंदोलन करण्यात आले. - योगेश गांगुर्डे, अध्यक्ष, गोई पाणीवापर सहकारी संस्था, देशमाने
पालखेड डावा कालवा प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे डोळ्यांदेखत उभे पीक जळत असल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट झाल्यानेच शेतकरी स्वतः आंदोलनात उतरले.
- हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना
बिगर सिंचनाचे मनमाड शहर, मनमाड रेल्वे, येवला शहर, ३८ गाव पाणीपुरवठा योजना, बोकटे, विठ्ठलाचे कोटमगाव आदींना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पिण्याचे पाणी देणे दोन दिवसांपासून सुरू आहे. सिंचन आणि बिगर सिंचन असे दोन्ही मार्ग पाणी आवर्तनातून ‘टेल’कडून येताना स्वीकारावे लागत आहेत. सर्वांना वेळेवर सिंचनासाठी पाणी देत आहोत. शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
- वैभव भागवत, उपकार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Irrigation Project: खानदेशातील सिंचन प्रकल्प रखडले

Revenue Day: महसूलच्या अधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते गौरव

Encroachment Free Vanpuri: पुरंदर तालुक्यातील ‘वनपुरी’ ठरले पथदर्शी

ZP School Success: साखराच्या जि.प. शाळेचा प्रेरक प्रवास

PM Kisan: किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी

SCROLL FOR NEXT