Drought Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : जिवापाड जपलेल्या फळबागांवर कुऱ्हाड

Team Agrowon

सूर्यकांत नेटके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Nagar News : नगर ः फळबाग लागवडीवर भर देत शासन विविध उपाययोजनांतून फळबागा लावण्याकडे शेतकऱ्यांना आकर्षित करत आहे. मात्र यंदा दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची उपलब्धता नसलेल्या भागात फळबागांवर कुऱ्हाड चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. राज्यात सध्या सुमारे ३० ते ४० टक्के फळबागा संकटात आहेत.

राज्यात पाण्याची कमतरता असलेल्या भागांसह शेतीला पर्याय म्हणून शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल आहे. राज्यात सुमारे साडे आठ लाख हेक्टरच्या जवळपास फळबागांचे क्षेत्र आहे. प्रामुख्याने पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत फळबाग लागवड आहे.

प्रामुख्याने संत्रा, मोसंबी, डाळिंब, सीताफळ, पेरू, केळी, आंबा, लिंबू या फळबागा आहेत. जांभूळ, बोर, नारळ, चिंच या तग धरणाऱ्या फळझाडांचीही शेतकरी लागवड करतात. शासनाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तसेच पाच एकरापेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळावा यासाठी स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविली जाते. अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांचाही फळबाग लागवडीवर कल आहे.

यंदा मात्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पाण्याची कमतरता आहे. अजून किमान महिनाभर फळबागा जगविण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागण्याची शक्यता आहे. मात्र पाणी नाही, विहिरींसह अन्य पाणीस्त्रोतांनी तळ गाठला, टॅंकरचे पाणी देऊन फळबागा जगवणे परवडणारे नसल्याने राज्यात सुमारे ४० टक्क्यापर्यंत फळबागांचे क्षेत्र अडचणीत आहे. अनेक शेतकरी फळबागांवर कुऱ्हाड चालवीत आहेत. फळबागा वाया जातील म्हणून शासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पोपटराव पवार यांनी केली होती. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

एक एकरात मोसंबीची लागवड केली होती. यंदा तीव्र दुष्काळ आहे. पाणी नसल्याने फळबाग जागेवरच करपली आहे. आमच्या भागात पाण्याअभावी बागा जळत असून शेतकरी फळबागा काढून टाकत आहेत.
- कारभारी पवार, शेतकरी, मठाचीवाडी, ता. शेवगाव, जि. नगर.

अनेक बागांना शेततळ्यांनी तारले
नगर, पुणे, सातारा, नाशिक, मराठवाडा, विदर्भातील अनेक भागांत शेतीसाठी पाण्याची स्थिती गंभीर आहे. अशा स्थितीत शेततळ्यांनी हजारो फळबागांना तारले आहे. पाण्याचे स्रोत कमी असलेल्या भागात फळबागा लागवडीचे प्रमाण अधिक असून अशा भागातील शेतकऱ्यांचे शेततळी करण्यावर भर आहे. यंदा फळबागा जगवण्यासाठी याच शेततळ्यांनी मोठा आधार दिला आहे. राज्यात एकूण फळबागांच्या ३० ते ४० टक्के बागा केवळ शेततळ्यांच्या पाण्यावर तग धरुन आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT