Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Podcast : निर्यातीच्या अधिसूचनेमुळे कांदा भावात सुधारणा

Market Update : कांदा बाजारातील आवक मार्च महिन्यात मर्यादीत होण्याची शक्यताही काही अभ्यासक व्यक्त करत आहेत.

Team Agrowon

Market Bulletin : सोयाबीन बाजारातील सुधारणा टिकून आहे. वायद्यांमध्ये मात्र शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कापस वायद्यांमध्ये चढ उतार झाले. पण प्रत्यक्ष खरेदीत कापूस बाजारातील तेजी कायम होती. काल देशातील बाजारात ९४ हजार गाठी कापूस आवक झाली होती.

तर सरासरी दरपातळी ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापूस बाजारातील आवक पुढील काळात आणखी कमी होणार आहे. त्यामुळे कापूस भावाला आणखी आधार मिळू शकतो, अशा अंदाज कापूस बाजरातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीन बाजाराने अद्यापही मान टाकलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. पण भावपातळी अजूनही निचांकी पातळीवरच आहे. देशातील बाजारात सोयाबीन आवक दीड लाख क्विंटलच्या दरम्यान आहे.

त्यामुळे सोयाबीनचा भाव ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

केंद्र सरकारने शुक्रवारी बांगलादेशला ५० हजार टन कांदा निर्यातीची अधिसूचना काढली. तशी ही निर्यातीला परवानगी मिळालेल्या कांद्याचे प्रमाण खूपच कमी आहे. तरीही बाजाराला काहीसा आधार मिळालेला दिसला.

काही बाजारात कांद्याचे भाव ५० ते १०० रुपयांनी वाढले होते. कांद्याची सरासरी भावपातळी आज १४०० ते १७०० रुपयांचा भाव मिळाला. तर बाजारातील आवक स्थिर होती. कांदा बाजारातील आवक मार्च महिन्यात मर्यादीत होण्याची शक्यताही काही अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

ज्वारीच्या भावातील तेजी काही प्रमाणात कमी झालेली दिसते. बाजारात ज्वारीची आवक वाढली आहे. रब्बीतील ज्वारी बाजारात येत असल्याने पुरवठा वाढलेला दिसतो. पण रब्बी ज्वारीच्या उत्पादनातही यंदा घट दिसून येत आहे.

त्यामुळे हा दबाव काही काळ राहून आवक कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते. सध्या ज्वारीला ३ हजार ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर पुन्हा सुधारू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

लाल मिरचीच्या भावात दिवसेंदिवस काहीशी वाढ होताना दिसत आहे. सध्या बाजारातील आवक कमीच आहे. तर दुसरीकडे उठाव चांगला आहे. दुष्काळामुळे यंदा मिरची उत्पादनात  ५ ते १५ टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे. ही परिस्थितीत लक्षात घेऊन स्टाॅकिस्ट आणि निर्यातदारही खरेदीत उतरले आहेत.

त्यामुळे मिरचीच्या भावात २० टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली. सध्या मिरचीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे १५ हजार ते २५ हजारांचा भाव मिळत आहे. मिरचीच्या भावातील ही तेजी टिकून राहील, असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT