Onion Chawl Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate Issue: एकीकडे भाव नाही, अन दुसरीकडे कांदा चाळीत सडतोय

Farmer Issue: एकीकडे कांद्याला भाव नाही, अन् दुसरीकडे चाळीत साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांची ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे. यामुळे कांद्याच्या भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेले कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nashik News: एकीकडे कांद्याला भाव नाही, अन् दुसरीकडे चाळीत साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांची ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे. यामुळे कांद्याच्या भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेले कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

कसमादे भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. या वर्षी पावसामुळे कांद्याचे रोप खराब झाल्याने शेतकऱ्यांना दुबार कांद्याचे रोप तयार करावे लागले. त्यात एकाचवेळी कांदा लागवड आल्याने अतिरिक्त मजुरी द्यावी लागल्याने लागवड खर्च वाढला. एवढ्यावरच न थांबता कांदा काढणीच्या वेळेस अवाच्या सव्वा खर्च करून कांदा चाळीत साठवला; परंतु एक-दीड महिन्यातच चाळीतला कांदा सडू लागला आहे.

तालुक्यातील भऊर येथील प्रभाकर नागू पवार यांनी एप्रिल महिन्यात साठवणूक केलेल्या कांद्याचे पाणी चाळीतून वाहू लागल्याने असा खराब झालेला कांदा टाकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कांद्याचा पैसा तर हाती आलाच नाही, उलट कांदा बाहेर काढून टाकण्याचा त्यांचा खर्च वाढल्याने ते हताश आहेत. सध्या उन्हाळ कांद्यास प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते १,१०० भाव मिळत आहे. आज ना उद्या भाव वाढेल या अपेक्षेने चाळीतील कांदा खराब होत आहे. एकीकडे भाव नाही अन् दुसरीकडे चाळीतील कांदा खराब होऊ लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत.

शेतकऱ्यांची आर्थिक समीकरणे विस्कळीत

शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थिती असताना शासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. सध्या शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतीमालाला भाव नाही. टोमॅटोसह इतर भाजीपाला अत्यल्प भावात विकला जात आहे. कोणते पीक घेऊन उत्पादन घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा साऱ्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक समीकरणे विस्कळीत झाली आहेत.

कांदा लागवडीपासून ते चाळीत साठवणूक करेपर्यंत लाखो रुपये खर्च केला. दोन-दोन वेळा कांद्याचे रोप टाकून आणि भरपूर खर्च करूनही कांद्याला भाव नाही. महिना-दीड महिन्यातच चाळीतला कांदा सडू लागल्यामुळे मजूर लावून फेकण्याची वेळ आली आहे.
प्रभाकर पवार, शेतकरी, भऊर, ता. देवळा
उन्हाळ कांदा लागवडीपासून, काढणी, साठवणूक यासाठी यंदा खर्च वाढला आहे. शिवाय कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट आली. त्यात कोसळत्या बाजारभावाने आर्थिक गणित बिघडवले. पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी आधीच त्रस्त झालेला असून, त्यातच साठवलेला कांदा खराब होऊ लागला आहे. त्यामुळे सरकारने कांद्याला योग्य भाव व नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांचे दु:ख कमी करावे.
कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Urea Shortage : कर्नाटक सरकारकडून केंद्र सरकारकडे युरियाची मागणी; 'कोटा संपला!' केंद्र सरकारचं उत्तर!

Solapur APMC : सोलापूर बाजार समितीत ११ नव्या पिकांचे नियमन

Crop Damage Compensation : मॉन्सूनपूर्व पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीला कात्री

Monsoon Rain Update: राज्यात मुसळधारेचा अंदाज; राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर कमी होणार

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री धाडसी आणि चांगले निर्णय घेणारे; कृषी कर्मचारी संघटनांचा कोकाटेंना पाठिंबा

SCROLL FOR NEXT