Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’बाबत साडेतीनशे शेतकऱ्यांचे आक्षेप

Acquisition of Agricultural Land : नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. याबाबत शासनाने राजपत्रही प्रसिद्ध केले आहे. याकरिता आता शेत जमिनीचे संपादन केले जाणार आहे.

Team Agrowon

Latur News : नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. याबाबत शासनाने राजपत्रही प्रसिद्ध केले आहे. याकरिता आता शेत जमिनीचे संपादन केले जाणार आहे. पण याला शेतकऱ्यांचा विरोध होऊ लागला आहे. लातूर, रेणापूर, औसा या तीन तालुक्यातून हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. या तीन तालुक्यातील १९ गावांतून ३५५ शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदविला आहे.

शक्तिपीठ हा राष्ट्रीय महामार्ग केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. काही दिवसापूर्वी अहमदपूर येथे विविध राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले होते. त्याच वेळी त्यांनी शक्तिपीठ महामार्ग येथून जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसातच या महामार्गाचे राजपत्र शासनाने प्रसिद्ध केले होते. यात ता. २८ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आक्षेप दाखल करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.

हा महामार्ग अंबाजोगाई येथून लातूर जिल्ह्यात येणार आहे. यात रेणापूर तालुक्यातील चार, लातूर तालुक्यातील अकरा व औसा तालुक्यातील आठ गावातून हा महामार्ग जाणार आहे. या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. या एकूण १९ गावातील ३५५ शेतकऱ्यांनी आक्षेप घेतले आहेत. यावर सुनावणी होणार आहे.

या बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी हा बागायती आहेत. अनेकांचा उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे. रस्त्यासाठी शेती गेली तर अल्पभूधारक किंवा भूमिहीन व्हावे लागणार आहे. आधीच शेती कमी झाली आहे. त्यातही शेती गेली तर हातात काहीच राहणार नाही याची भीतीही शेतकऱ्यांना आहे. शेती गेली तर आर्थिक स्थितीच ढासळणार आहे. त्यामुळे या महामार्गाला विरोध होत आहे. सुनावणीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीनंतरच होणार आहे. त्यात काय होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असणार आहे.

या गावांतून होतोय विरोध

शक्तिपीठ महामार्ग हा लातूर तालुक्यातील गांजूर, रामेश्वर, दिंडेगाव, कासारजवळगा, काटगाव, मांजरी, चिंचोली बल्लाळनाथ, गातेगाव, मुरुड-अकोला, चाटा, बोपला या मांजरा नदीच्या पट्ट्यातून जात आहे. तसेच रेणापूर तालुक्यातील डिघोळ देशमुख, भोकरंबा, चाडगाव व मोरवड या ऊस लागवड असलेल्या भागामधून हा महामार्ग जात आहे. तसेच औसा तालुक्यातील कवठा केज, नावोली, भेटा व अंधोरा या गावातून हा महामार्ग जात असून या गावातील शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे.

नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. शासनाने राजपत्रही प्रसिद्ध केले आहे. यासाठी शेतजमिनी संपादित केल्या जाणार आहेत. अगोदरच शेतकरी गुंठ्यावर आला आहे. शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे. जमिनी संपादित केल्यास शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
केदारनाथ बिडवे, शेतकरी, मुरुड अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT