Shaktipeeth Highway : आमची मागणीच नाहीतर शक्तिपीठ महामार्ग कशाला, शेतकऱ्यांचा मेळाव्यात अधिकाऱ्यांना सवाल

Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख बाधित शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highwayagrowon
Published on
Updated on

Nagpur Goa Highway : शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख बाधित शेतकऱ्यांचा पश्चिम महाराष्ट्र मेळाव्यात राज्यव्यापी लढा मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. कवलापूर (ता. मिरज) येथील महादेव मंदिरात शेतकरी कामगार पक्ष, नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे वतीने शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा झाला.

मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक राज्य समन्वयक दिगंबर कांबळे म्हणाले की, शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा असून, या महामार्गाची कुणीही मागणी केली नाही. शेतकऱ्यांच्यावर लादलेला अन्यायकारक महामार्ग त्वरित रद्द करावा, संविधानात कोणतेच कायदे माणसांना उद्ध्वस्त करणारे नाही. माणसांना संरक्षण देणारे सर्व कायदे आहेत.

शेतकऱ्यांविरोधात केलेली कायद्यातील मोडतोड बदलण्यास भाग पाडू. शक्तिपीठ महामार्ग १९५५ च्या कायद्याने सक्तीने भूसंपादन करणार असल्याचे शासनाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. शासन जर असे करणार असेल तर नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या २२ मागण्या पूर्ण करून मगच महामार्गाचे हद्दी फिक्स करण्याचे काम करावे.

खासगी वाटाघाटी या शासनाच्या डोक्यातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या नसाव्यात तर त्या गावगाड्यावरील परंपरागत असाव्यात शासन जमिनी खरेदी करणार असेल तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा दर विचार करावा. त्याच्याशी खासगी वाटाघाट करावी. बाधित क्षेत्राला कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये मोबदला एकसमान सरसकट जाहीर करा, ज्या ठिकाणी एमआयडीसी झोन व महानगरपालिका क्षेत्र असेल तिथे चार कोटी रुपये मोबदला व जिथे या पेक्षा जास्त दर आहे तिथे तिथल्या दरानुसार मोबदला मिळालाच पाहिजे.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगलीत ८ एप्रिलपासून धरणे आंदोलन

भूषण गुरव यांनी स्वागत केले. घनःश्याम नलवडे यांनी प्रास्ताविक केले. बाधित शेतकऱ्यांच्या हरकती आक्षेपाबाबत तातडीने प्रांताधिकारी यांनी सुनावणी घ्यावी व सुनावणी घेत असताना गाववार सुनावणी घ्यावी, सुनावणी वेळी आपले म्हणणे एकसमान सांगण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी प्रवीण पाटील, गजानन सावंत, विष्णू सावंत, भूषण गुरव, रमेश कांबळे, शिवाजी शिंदे, राहुल जमदाडे, सागर बिले, महेश बिले, आनंदा मोरे, हणमंत सावंत, नंदकुमार माळी, ओम

घनःश्याम नलवडे यांनी प्रास्ताविक केले. बाधित शेतकऱ्यांच्या हरकती आक्षेपाबाबत तातडीने प्रांताधिकारी यांनी सुनावणी घ्यावी व सुनावणी घेत असताना गाववार सुनावणी घ्यावी, सुनावणी वेळी आपले म्हणणे एकसमान सांगण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी प्रवीण पाटील, गजानन सावंत, विष्णू सावंत, भूषण गुरव, रमेश कांबळे, शिवाजी शिंदे, राहुल जमदाडे, सागर बिले, महेश बिले, आनंदा मोरे, हणमंत सावंत, नंदकुमार माळी, ओम कुंभार, शिवराज पाटील, प्रकाश टकले, राहुल खाडे उपस्थित होत्या.

कुटुंबाचा लढा

आता हा फक्त बाधित शेतकऱ्यांचा लढा नसून संपूर्ण कुटुंबाचा आहे, म्हणून मेळाव्याला महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com