Minister Shivrajsingh Chauhan  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Research India : दिल्लीतून नाही, तर शेतातून संशोधनाची दिशा ठरणार

Agriculture Minister Shivrajsingh Chouhan : देशात १६ हजार शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, ते संशोधन करतात परंतु ते प्रयोगशाळेत करतात आणि शेतकरी काम करतो शेतात. शेतकऱ्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत ते लक्षात घेतले जात नाही.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ‘‘देशात १६ हजार शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, ते संशोधन करतात परंतु ते प्रयोगशाळेत करतात आणि शेतकरी काम करतो शेतात. शेतकऱ्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत ते लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान बांधावर पोहोचलेच नाही. यापुढे आता दिल्लीतून नाही, तर शेतातून संशोधनाची दिशा ठरेल,’’ असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले.

विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित शेतकरी मेळाव्यात रविवारी (ता. १८) ते बोलत होते. व्यासपीठावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक मंगलसिंग जाट, कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्‍त सुरज मांढरे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे, राष्ट्रीय मृदा सर्व्हेक्षण व उपयोगिता संस्थेचे संचालक डॉ. नितीन पाटील, कुलगुरू डॉ. शरद गडाख, ‘माफसू’चे कुलगुरू डॉ. नितीन पाटील या वेळी उपस्थित होते.

भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत महाराष्ट्रात ११ संस्था आहेत. परंतु त्यांचा एकमेकांशी संवाद नाही. त्यामुळे त्यांना एकत्रित करीत संशोधनात्मक पातळीवर रोडमॅप तयार करण्याची गरज असल्याचे लक्षात आले. म्हणूनच एक राष्ट्र, एक कृषी, एक संघ अभियान संशोधनात्मक स्तरावर राबविण्यात येईल, अशी घोषणा श्री. चौहान यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की राज्यात सात विभाग जलसंधारणात काम करीत होते. त्यांना एकत्रित करून जलयुक्‍त शिवार योजना राबविली. त्याचे परिणाम दिसले. संशोधनात्मक स्तरावर देखील अशाच एकत्र करणाची गरज असून त्यातूनच शेतीत अपेक्षित बदल दिसतील.

कृषिमंत्री कोकाटे म्हणाले

कापसात एचटीबीटीला मान्यता मिळावी.

शेती कामांचा समावेश रोजगार हमी योजनेत व्हावा.

केंद्राकडून भांडवली गुंतवणुकीसाठी निधी मिळावा.

खते लिंकिंग रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा आवश्‍यक आहे.

‘एआय’ फेरोमेन सापळा

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने एआय तंत्रज्ञान आधारीत फेरोमॅन ट्रॅप विकसित केले आहे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण याद्वारे प्रभावीपणे शक्‍य होईल. त्यासोबतच मातीच्या प्रकाराची माहिती देणाऱ्या पहिल्या नॅशनल सॉइल स्प्रेक्‍ट्रल लॅबोरेटरीचे उद्‌घाटन शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT