Organic Carbon Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Carbon : जमिनीत ‘सेंद्रिय कर्ब’चे प्रमाण कमी, अन्न घटकांचे असंतुलन

Organic Farming : शेतकऱ्यांनी यातून सावरण्यासाठी माती परीक्षणावर आधारित सल्ल्यानुसार रासायनिक आणि जैविक खतांचा वापर करणे आवश्यक असल्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : जिल्ह्यातील शेत जमिनीतील मुख्य अन्नघटक नत्र, स्फुरद, पालाश तसेच ‘सेंद्रिय कर्ब’ यांचे असंतुलन झाल्याचे गेल्या काही वर्षांतील माती परीक्षणातून निदर्शनास आले आहे. शेतकऱ्यांनी यातून सावरण्यासाठी माती परीक्षणावर आधारित सल्ल्यानुसार रासायनिक आणि जैविक खतांचा वापर करणे आवश्यक असल्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास येथे खरिपाचे नियोजित क्षेत्र ४.६० लाख हेक्टरवर आहे. तर रब्बीचे सुमारे १.८० लाख हेक्टरवर आहे. शेत जमिनीत चांगल्या उत्पादनासाठी नत्र (नायट्रोजन) चे प्रमाण हे मध्यम असणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यात हे प्रमाण कमी आहे. स्फुरद (फॉस्फरस) चे प्रमाण आवश्यकतेनुसार असले तरी पालाश (पोटॅशियम)चे प्रमाण जमिनीत जास्त आहे.

त्याचप्रमाणे पिकांची अन्न घटकांची गरज पूर्ण होण्यासाठी आणि रासायनिक खतांचा शिफारशीप्रमाणे वापर करून ही खते जमिनीत टाकल्यानंतरसुद्धा पिकाला आवश्‍यक त्या स्वरूपात सदर अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी विशिष्ट सूक्ष्म जिवांची गरज असते. हे सूक्ष्म जीव जमिनीतील सेंद्रीय कर्ब या घटकावर अवलंबून असल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे अत्यंत आवश्‍यक आहे.

जेणेकरून देत असलेल्या रासायनिक खते पिकास पाहिजे त्या स्वरूपात उपलब्ध होतील, असे कृषी विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आजही जिल्ह्यातील अनेक शेतकरी कृषी विभागाच्या शिफारशीऐवजी पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीनेच खतांचा अवलंब करीत आहेत.

त्यामुळे जमिनीत अनावश्‍यक खते मोठ्या प्रमाणात जात आहेत. जमिनीची पोत राखण्यासोबतच पिकाची वाढ उत्तम ठेवत चांगल्या दर्जाचे उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षणावर आधारित खतांचा अवलंब करण्याचा सल्ला जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी विभागाकडून देण्यात आला आहे.

मातीचा पोत का बिघडला?

रासायनिक खतांचा वारेमाप वापर केल्यास जमिनीचा पोत बिघडतो. माती परीक्षण किमान दोन ते तीन वर्षांतून एकदा केल्यास जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याची माहिती मिळते. पूर्वी शेतकरी शेतातील गवत खुरपणी, वखरणीद्वारे काढत. आता तणनाशकाची फवारणी करून तण नष्ट करण्यात येते. तणनाशक वापरल्याने जमिनीतील जैविक घटक नष्ट होतात. याचा ही परिणाम उत्पादकतेवर होतो.

जमिनीचा पोत वाढविण्यासाठी काय करायला हवे...

- रासायनिक खतांचा वापर संतुलीत करण्याची गरज.

- सेंद्रिय खतांचा वापर वाढविण्याकडे भर देण्याची गरज.

- कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार खतांचा वापर करण्याची गरज.

- दोन ते तीन वर्षांतून एकदा तरी माती परीक्षण करावे.

- एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा.

माती परीक्षण करून शिफारशीप्रमाणे पिकांना एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन पद्धतीनुसार खतांचा पुरवठा करावा. शिफारस केलेली शेणखताची मात्रा, रासायनिक खताची मात्रा आणि जैविक खते इत्यादींचा एकात्मिक वापर करणे गरजेचे आहे.
- दीक्षिता तिरमारे, जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT