Dhannjay Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay Munde : ‘ॲग्रोवन’शी माझे भावनिक नाते

Article by Balasaheb Patil : ‘ॲग्रोवन’ या दैनिकाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनेक बदल घडवले आणि शेती पत्रकारितेत एक मानदंड तयार केलाय. अशा दैनिकाने १८ वर्षे पूर्ण केली.

Team Agrowon

Dhananjay Munde : ‘ॲग्रोवन’ या दैनिकाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनेक बदल घडवले आणि शेती पत्रकारितेत एक मानदंड तयार केलाय. अशा दैनिकाने १८ वर्षे पूर्ण केली. हा एक मैलाचा दगड आहे. यंदाच्या दिवाळी अंकासाठी त्यानिमित्ताने सिंहावलोकनाचा केलेला हा प्रयत्न स्तुत्य आहे. यात आत्मप्रौढी नाही तर आपण योग्य मार्गावर आहोत की नाही याचीही चाचपणी करण्याचा हा प्रयत्न आहे.

‘ॲग्रोवन’शी माझा भावनिक धागा गुंतलेला आहे. या दैनिकाची आणि माझी ओळख वडिलांमुळे झाली. माझ्या वडिलाच्या जीवनात या वृत्तपत्राचे वेगळे महत्त्व होते. ते सकाळी उठले, की त्यांच्या समोर या दैनिकाचा अंक असायचा. सकाळी उठले की वैद्यनाथ कारखान्याच्या आणि आजूबाजूच्या कारखान्यांच्या क्रशिंगची आकडेवारी आणि हंगाम नसेल, तर अन्य काय कामे सुरू आहेत याची इत्थंभूत माहिती त्यांना हवी असायची.

त्या सोबत चहा घेत ते ॲग्रोवन वाचून काढत असत. हे सगळं सुरू असताना त्यांच्या अवतीभवती माणसांचा गराडा असायचा. या गराड्यात आणि गोंधळातही ते इतकं मन लावून काय वाचतात याचे मला आश्‍चर्य वाटायचे. माझ्या वडिलांचा दिवस या वृत्तपत्रासोबत सुरू व्हायचा हे माझ्या मनावर ठसले. ते नेमके काय वाचतात हे पाहण्यासाठी मी हे वृत्तपत्र वाचू लागलो.

‘ॲग्रोवन’ने आजपर्यंत अनेक प्रश्‍न उपस्थित केले. मी विधान परिषदेत विरोधी पक्षनेता असताना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर लढा उभा करण्यासाठी, सभागृहात काही प्रश्‍न उपस्थित करायचे असतील तेव्हा मी या वृत्तपत्रातील संदर्भांशिवाय पुढे जात नव्हतो. शेतकऱ्यांचे प्रश्‍न प्रखरपणाने मांडण्यासाठी, जो काही संघर्ष केला त्यासाठी या संदर्भांचा खूप फायदा झाला. शेतकऱ्यांचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. मी विधिमंडळात जे प्रश्‍न मांडले ते पूर्ण सुटले असे नाही, त्यामुळे संघर्ष यशस्वी झाला असे म्हणणार नाही.

हा संघर्ष कधी संपेल हे मला सांगता येणार नाही. पण निश्‍चितच या संघर्षातील एक धागा म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मी काम केले त्यात या वृत्तपत्राचा वाटा मोठा आहे. मी अभ्यासूपणे सभागृहात आणि सभागृहाबाहेर बोलतो त्यावरून शेतकऱ्यांना वाटते की हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकतो.

हा विश्‍वास निर्माण करण्यात या वृत्तपत्राचा मोठा वाटा आहे. या वृत्तपत्रात मांडण्यात आलेले प्रश्‍न, मुद्दे मी सभागृहात उपस्थित करायचो. त्यातून महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाला वाचा फुटत होती. बघा, काळाचे चक्र कसे फिरते! एक काळ होता की माझ्या वडिलांनी ऊस तोडला, शेती केली. शेतीनिष्ठ शेतकरी अशी त्यांची ओळख होती. शेतीत नवीन गोष्टी करण्याचा त्यांना नाद होता.

त्यांच्याकडे पाहून शेतकऱ्यांसाठी मी संघर्ष केला. आणि त्यानंतर या शेतकऱ्याच्या मुलाला कृषिमंत्री म्हणून संधी मिळावी हा मोठा योगायोग आहे. याचाच अर्थ असा आहे, की कुठेतरी नियतीला वाटते की शेतकऱ्यांची जबाबदारी याच्या खांद्यावर दिल्यावर शेतकऱ्यांच्या जीवनातील अडचणी, दु:ख नाहीसे होईल.

या वृत्तपत्राने शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल केला असला तरी आता यापुढे शेती हा आपला व्यवसाय आहे हे ठासून सांगायला हवे. हवामान बदलाचं आव्हान पेलण्यासाठी नेमकं काय करायला हवं याचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे. नव्या पिढीला परंपरागत पद्धतीची शेती सोडून नवे संशोधन स्वीकारले पाहिजे याची जाणीव करून दिली पाहिजे.

सत्तेवर नेहमी पत्रकारितेचा वचक असतो. या वृत्तपत्राने शेतकऱ्यांना माहिती देण्याबरोबरच त्या पलीकडे जाऊन धोरणात्मक निर्णयांसाठी सरकारला रस्ता दाखविण्याचे काम केले आहे. शेती क्षेत्रातील बदलाबद्दल सकारात्मक भूमिका घेतानाच चुकीच्या बाबींवर आसूड ओढण्यास या वृत्तपत्राने कधीच मागेपुढे पाहिले नाही. यापुढील काळातही शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून पत्रकारितेचे अखंड व्रत जोपासले जाईल, याची मला खात्री आहे.

(शब्दांकन : बाळासाहेब पाटील )

धनंजय मुंडे, कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

Flower Farming : फुलशेतीत उत्साहाचा ‘फुलोरा’

Paddy Plantation : पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यात

Wildlife Crop Damage : नेसरी भागात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

SCROLL FOR NEXT