MP Vinayak Raut Agrowon
ॲग्रो विशेष

MP Vinayak Raut : राज्य संकटात असताना मुख्यमंत्री प्रचारात

Team Agrowon

Nashik News : अवकाळी पावसामुळे राज्य संकटात असताना राज्याचे मुख्यमंत्री तेलंगणात प्रचार करीत असल्याची टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली. दरम्यान, २३ जानेवारीला (कै.)बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये ठाकरे गटाचे महाशिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

महाशिबिरात शेतकरी, नोकरदार, महिला आणि राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर मंथन केले जाणार असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या महाशिबिराला उपस्थित राहणार आहेत.

अवकाळी पावसाने राज्यात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाल्याने शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार राऊत नाशिक दौऱ्यावर आले होते. या वेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली.

दौऱ्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले, की अवकाळी पावसामुळे हाता-तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला गेला आहे. राज्य संकटात आहे; परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र तेलंगणात जाऊन प्रचार करीत आहेत.

इगतपुरी तालुक्यात विनायक राऊत, नितीन बानगुडे पाटील यांच्यासह नाशिकच्या ठाकरे गटाच्या इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांच्यावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत राऊत म्हणाले, की मिंधे सरकारने पोलिसांच्या बळाचा वापर करून दत्ता दळवी यांच्यावर कारवाई केली.

अतिरेक्यांवर जशी धाड घालतात त्याप्रमाणे कारवाई करत दळवी यांना पकडले. पण याचवेळी सुर्वे आणि सरवणकर यांच्या कृत्याचे काही नाही. सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा रिपोर्ट आला तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.

भुजबळांवर टीका...

मराठा आणि ओबीसी तेढ निर्माण करण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातले मंत्री व्यासपीठावर येऊन विसंवाद निर्माण करत आहेत, हे योग्य नाही. मंत्र्यांनी रस्त्यावर येऊन शड्डू ठोकणे योग्य नाही. मुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून हे होत असल्याचा संशय आहे. पण राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल मला कौतुक वाटते. त्यांनी भुजवळ यांच्या भूमिकेबद्दल स्पष्ट बोलून धारिष्ट्य दाखविले ते मुख्यमंत्री यांनी दाखवायला पाहिजे.

नुकसानग्रस्तांना ५० हजारांची मदत करा

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजारांची तत्काळ मदत करा, शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय आमचे आमदार हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा थेट इशारा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी सरकारला दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT