Ahilyanagar News : अहिल्यानगर लोकसभा मतदार संघात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात येत असलेली कामे अतिशय निकृष्ट दर्जाची सुरू आहेत, तर काही बंद आहेत. या जलजीवनच्या सर्व योजनांच्या कामांचे केंद्र सरकारने त्रयस्त समितीमार्फत तपासणी करावी, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे केली.
अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन योजनेच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा सातत्याने आरोप होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही अनेक गावांत पाणी मिळाले नाही. याबाबत खासदार नीलेश लंके दोन दिवसांपूर्वी जलशक्तिमंत्री सी. आर. पाटील यांची नवी दिल्लीत भेट घेतली.
पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर ७९ योजनांपैकी जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दहा योजना पूर्ण झाल्या आहेत. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीही आपणाकडे प्राप्त झाल्या आहेत.
श्रीगोंदे तालुक्यातील अजनुज आनंदनगर व अन्य आठ योजनांचे केंद्रीय समितीमार्फत ऑडिट केल्यास या कामांमधील भ्रष्टाचार उघड होणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर या योजनांचे ऑडिट करावे.
यासंदर्भात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांच्या कामांचे केंद्रीय समितीमार्फत ऑडिट करण्यासंदर्भात आपण जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे दोन ते तीन वेळा पत्रव्यवहार केला.
मात्र, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. डिसेंबरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीच्या बैठकीतही लंके यांनी या योजनेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते. भ्रष्टाचार नसेल तर मी राजीनामा देतो, असे आव्हान लंके यांनी दिले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.