Water Management Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Water Crisis : पाण्यासाठी आजी-माजी आमदार आक्रमक

Water Scarcity in Solapur : उपमुख्यमंत्री पवारांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक

Team Agrowon

Solapur News : सांगोला तालुक्यात सध्या पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढील हंगामातील पाणीटंचाई लक्षात घेता नीरा उजवा कालव्याच्या पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत पाण्यासाठी जोर लावला.

रब्बी हंगामाच्या सिंचन नियोजनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. २०) पुणे येथील सिंचन भवनात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली.

बैठकीस अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, कार्यकारी संचालक कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार शहाजी पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार राम सातपुते, आमदार रवींद्र दंगेकर, माजी आमदार दीपक साळुंखे, आदी उपस्थित होते.

अशावेळी नीरा उजवा कालव्याचे पाणी रब्बी हंगामासाठी तत्काळ सांगोला तालुक्यासाठी सोडावे, अशी आग्रही मागणी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार साळुंखे- पाटील यांनी केली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बैठकीमध्ये नीरा उजवा कालव्यातून रब्बी हंगामासाठी तालुक्याच्या हक्काचे पाणी मैल ९३ पासून पूर्ण क्षमतेने म्हणजेच ४०० क्युसेकने सांगोला तालुक्याला मिळाले पाहिजे. तालुक्यात सध्या सरासरीच्या निम्मा पाऊस झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि जनावरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

तिसंगी तलाव भरण्यासाठी आमदार पाटील आग्रही

रब्बी हंगामाच्या दृष्टीने शेतीपिके व नागरिकांना पिण्यासाठी नीरा उजवा कालव्यामधून पाणी सोडून सांगोला विधानसभा मतदारसंघातील तिसंगी (पंढरपूर) तलावासह महिम, चिंचोली व हलदहिवडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत.

तसेच सांगोला शाखा फाटा क्रमांक- पाचला पाणी सोडून लाभक्षेत्रातील आवर्तन पूर्ण करण्याची आग्रही मागणी आमदार शहाजी पाटील यांनी बैठकीत लावून धरली.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार पाटील यांच्या मागणीप्रमाणे तातडीने निर्णय घेऊन येत्या १० नोव्हेंबरपासून नीरा उजवा कालवा अंतर्गत डी- तीन पळशीमार्गे पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

आमच्या हक्काचे पाणी पूर्ण क्षमतेने द्या

सांगोला तालुक्याच्या हक्काचे ‘टेल टू हेड’ या नियमाप्रमाणे पूर्ण क्षमतेने पाणी मिळाले पाहिजे. अशा बैठका याअगोदरही झाल्या आहेत, यापुढेही होतील. आजी-माजी आमदार पाण्यासाठी जोर लावत आहेत, हे तालुक्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु नियमितपणे हक्काचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळावे, असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT