Farmer Loan Waive Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : तेलंगणातील शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी

Team Agrowon

Hyderabad News : तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शनिवारी (ता.२२) यांनी केली आहे. या कर्जमाफीमुळे ४० लाखांवर शेतकरी कर्जमुक्त होतील, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी तेलंगणातील कर्जमाफीबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘‘तेलंगणातील अन्नदात्यांचे आम्ही अभिनंदन करतो. आम्ही ‘जे सांगितलं ते केलं’ असे ‘एक्स’वर त्यांनी म्हटले आहे.

‘‘तेलंगणातील शेतकरी कुटुंबांचे अभिनंदन. काँग्रेस सरकारने तुमचे २ लाख रुपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ करून ‘किसान न्याय’ ची प्रतिज्ञा पूर्ण केली. आम्ही आमच्या आश्वासनांच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले. या कर्जमाफीमुळे ४० लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबे कर्जमुक्त होतील,’’ राहूल गांधी यांनी म्हटले आहे.

‘‘जे काही सांगितलं होतं, ते मी केलं. हा माझा हेतू आहे. हीच माझी सवय आहे. काँग्रेस सरकारचा अर्थच हा आहे की, राज्याची तिजोरी शेतकरी आणि मजुरांसह वंचित समाजाच्या बळकटीसाठी खर्चाची हमी. तेलंगणा सरकारचा हा निर्णय हे याचे उदाहरण आहे. आमचे वचन आहे की, काँग्रेसचे जिथे जिथे सरकार असेल तिथे भारताचा पैसा ‘भांडवलदारांवर’ नाही तर ‘भारतीयांवर’ खर्च केला जाईल,’’ असेही त्यांनी सांगितले.

देशातील सर्व संपत्ती देशातील जनतेची असून ती केवळ लोकांच्या हितासाठीच खर्च झाली पाहिजे, असे काँग्रेसचे मत असल्याचे प्रियांका गांधी म्हणाल्या. तसेच आम्ही राजस्थान आणि छत्तीसगडमधील शेतकऱ्यांचे कर्जही माफ केले होते. केंद्रात आमचे सरकार असताना देशभरातील शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. काँग्रेस पक्ष शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित, वंचित आणि मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचेही त्या म्हणाल्या.

‘कर्जमाफी लवकरच लागू करणार’

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर ३१ हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मागील बीआरएस सरकारनेही अशीच एक योजना जाहीर करत १ लाख रुपयांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र ते त्यांनी पूर्ण केले नाही. त्यामुळे शेतकरी व शेती अडचणीत आली आहे. आमच्या सरकारने मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी लवकरच शेतकऱ्यांसाठी लागू केली जाईल,’’ असे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांद्यात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत टोमॅटो दर?

Khapali Wheat : खपली गहू लागवडीला हवे प्रोत्साहन

Nana Patole : शेतकऱ्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणारे नाना पटोले

Farmers Welfare : शेतकरी कल्याणाचा वसा

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT