Kolhapur Flood Survey agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Flood Survey : महापुरात सर्वाधिक बाधित होणाऱ्या तालुक्यालाच वगळलं, जागतिक बँकेने काय पाहणी केली?

sandeep Shirguppe

Kolhapur Shirol Flood : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या ४ दिवसांपूर्वी जागतीक बँकेच्या समितीने पुरग्रस्त भागाची पाहणी करत काही सूचना केल्या. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक बाधीत होणाऱ्या शिरोळ तालुक्याकडे या समितीने पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान शिरोळ तालुक्याचे होते परंतु या भागातील बाधितांच्या समस्या आणि वेदनांकडे जागतिक बँकेच्या समितीली वेळ मिळाला नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शिरोळ तालुक्याती नदीलगत असलेल्या ५२ गावांपैकी ४७ गावांना महापुराचा मोठा फटका बसतो. चार नद्या असलेल्या या तालुक्यात महापुराची परिस्थिती भयावह असतानाही जागतिक बँकेच्या समितीला शिरोळ तालुक्याची पाहणी करण्यासाठी वेळ मिळाला नाही. तालुक्यातील पाचपैकी सुमारे तीन लाख लोक महापुराने बाधित होतात. तर जिल्ह्यातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या खिद्रापूर मंदिराचीही पाहणी करण्यात आली नाही.

जवळपास ७० ते ८० टक्के तालुक्याला महापुराचा फटका बसतो. उसासह भाजीपाला तसेच घरे जमीनदोस्त होतात. तितकीच घरे भगदाड पडून राहण्यास असुरक्षित होतात. २००५, २००६, २०१९, २०२१ या वर्षांत महापुराने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत करत मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

२००५ च्या महापुरात प्रशासनाने पूरबधित कुटुंबांना सुरक्षितस्थळी वास्तव्य करता यावे यासाठी निवारा शेडची उभारणीचे काम हाती घेतले होते. तत्कालीन लोकप्रतिनिधीच्या हस्ते उ‌द्घाटन करण्यापुरते पाच निवारा शेड उभारले. नंतर हे काम ठप्प राहिले.

महापुरात बहुतांश गावातील शाळा पाण्याखाली असतात तर सुरक्षित असणाऱ्या शाळांमध्ये पूरग्रस्त गावातील लोकांची निवास व्यवस्था केली जाते. याकाळात पंधरा-पंधरा दिवस मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. दूध उत्पादकांपुढेही मोठ्या समस्या निर्माण होतात. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये महापुराची भीती सुरू होते. सातत्याने आश्वासने मिळतात. मात्र, ती पूर्ण होत नसल्याची खंत पूरग्रस्तांना आहे.

महापुरावर उपाययोजना करण्यासाठी नुकतीच जागतिक बँकेच्या समितीने जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र, सर्वाधिक नुकसान होणाऱ्या शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तालुक्यातील पूरबाधित गावांना समितीने भेट न देताच पाठ फिरविल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रस्तावित निवारा शेड

तालुक्यातील ४७ गावांना महापुराचा फटका बसतो. याकाळात बाधित लोकांच्या निवाऱ्याची सुविधा करण्यासाठी टाकळी, नांदणी, उदगाव, शिरोळ, अब्दुललाट येथे सुमारे तीन एकरांत निवारा शेड बांधण्याचा प्रस्ताव होता. मात्र, केवळ पुरातच या प्रस्तावावर चर्चा होत राहिली आहे.

लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची गरज

जागतिक बँकेची समिती जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची माहिती घेत असताना शिरोळ तालुक्यातील महापुराची भीषणता त्यांच्या दृष्टीस आणून देणे गरजेचे होते. चार नद्यांच्या या तालुक्यात महापुराची आणि नंतर होणान्या नुकसानीची माहिती असूनही लोकप्रतिनिधी यात कमी पडले, याची खंत पुरग्रस्तांना आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT