Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : यंदा सव्वासहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित

Team Agrowon

Nashik News : यंदा मॉन्सून चांगला बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. यंदा जिल्ह्यात खरिपासाठी ६ लाख २८ हजार ७०० हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात खतांची व बियाण्यांचा काळाबाजार होवू नये, यासाठी कृषी विभागाने १७ पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच युरिया साडेआठ हजार टन बफर स्टॉक करून ठेवल्यामुळे खतांची टंचाई जाणवणार नसल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

कृषी विभागाचे प्रधान सचिव जोशी यांनी शुक्रवारी (ता. २४) ऑनलाइन पद्धतीने कृषी विभागाची खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न झाली. कृषी विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, गुणनियंत्रण संचालक विकास पाटील सहभागी झाले, तर जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

खरीप हंगामासाठी २ लाख २० हजार टन खतांचे आवंटन मंजूर झाले असून, ७१ हजार २४३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. मे महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होण्यापूर्वी शेतकरी, तसेच कृषी विभागास खरिपाचे वेध लागतात. त्यानुसार कृषी विभागाने आगामी खरीप हंगामासाठी तयारीला सुरुवात केली आहे.

गतवर्षी ६ लाख २६ हजार १९० हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. यंदा यात वाढ झाली असून, ६ लाख २८ हजार ७०० हेक्टर क्षेत्र खरिपासाठी निश्‍चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरा यंदा मक्याचा असेल. दोन लाख ४२ हजार हेक्टरवर मका, तर ९४ हजार हेक्टरवर भात, तर केवळ ६०० हेक्टरवर ज्वारीची लागवड केली जाईल. याशिवाय बाजरी ६१ हजार, नागली १६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे.

खरिपाकरिता खते व बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. खासगी आणि सार्वजनिक अशी एकूण ७१ हजार २४३ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. महाबीजकडून ५ हजार ८५१ क्विंटलची मागणी नोंदविली आहे. सोयाबीनसाठी प्रस्तावित १ लाख २२ हजार हेक्टरकरिता १ लाख १ हजार ६६४ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात विभागात १० हजार क्विंटल बियाण्यांची खेप पोहोचेल असे नियोजन आहे.

जिल्ह्यासाठी २ लाख ६० हजार टन खतांची मागणी करण्यात आली होती. यापैकी २ लाख २० हजार ६०० टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. यात युरिया ७६ हजार ९०० टन, डीएपी १८ हजार ३०० टन तर, एसएसपीचे २६ हजार ५०० टनांचा यात समावेश आहे. खतांची तपासणी करण्यासाठी पथके नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पथके तयार करण्याची तयारी केली आहेत.

कृषी विभागाकडून १७ भरारी पथकांची नियुक्ती

ऐन पावसाळ्यात एकाच वेळी बियाण्यांसह खतांच्या मागणीच वाढ होते. त्यामुळे महाराष्ट्रात गुजरात व मध्य प्रदेशातून बोगस बियाणे दाखल होण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने कृषी विभागाने १७ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. एका शेतकऱ्याला खतांच्या पाच बॅगा दिल्या जातील. त्यामुळे खतांची साठवणूक करण्यावर मर्यादा घातली जाणार आहे. साडेआठ हजार टन युरियाची साठवणूक केल्यामुळे टंचाई निर्माण होताच हा युरिया बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT