Forest Fire
Forest Fire  Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Fire : कोकणात उष्णतेच्या लाटेमुळे वणव्याच्या घटनांत वाढ

Team Agrowon

Alibag Forest Fire News : उत्तरेकडून येणाऱ्या उष्णतेच्या लाटेमुळे (Heat Wave) कोकणातील तापमानात वाढ (Temperature) झालेली आहे. पंधरा दिवसांपूर्वी थंडीने (Cold) कुडकुडणारे नागरिक आता घामाच्या धारांनी हैराण झाले आहेत.

सध्या किमान तापमान ३० अंशाच्या आसपास पोहचले असून पुढील काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे जंगल भागात वणवे (Forest Fire) लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

हवामान विभागानेही तापमान वाढीचा इशारा दिला आहे. पावसाळ्यात उगवलेला गवत आता पूर्णपणे सुकलेला असल्याने या आगी सहज लागत आहेत.

या आगी विझवण्याचे मोठे आवाहन ग्राम वन समितीच्या सदस्यांवर येऊन पडले आहे. वन विभागानेही वणवे लागू नयेत यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

वाढत्या तापमानाचा परिणाम फळधारणेस आलेल्या आंबा-काजू पिकाला होण्याची शक्यता आहे. उष्णतेमुळे कोवळी फळे तग धरु शकत नसल्याचे येथील बागायतदारांचे म्हणणे आहे.

बागेतील सुकलेला गवत काहींनी अद्याप काढलेला नाही, या गवताने पेट धरल्यास पिकत्या झाडांनाही धोका पोहचण्याची शक्यता आहे.

दुपारच्या वेळी तापमानात वाढ होत असल्याने सणासुदीचे दिवस असूनही रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी झालेली दिसून येत आहे. आरोग्य विभागानेही या उष्णतेचा सामना करण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT