Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Water Update : धरणापेक्षा उच्चस्तरीय बंधारेच भारी; पहिल्या पावसानंतर ३५ टक्के पाणी

Water Stock : पहिल्याच पावसानंतर तीनही नदीपात्रात चांगले पाणी आल्यामुळे हा बंधाऱ्यांमध्ये मोठा पाणीसाठा आला आहे.

Team Agrowon

Latur News : नदीपात्रातून पावसाचे किंवा धरण भरल्यानंतर सोडून देण्यात येणारे अतिरिक्त पाणी अडवून नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा देण्यासाठी मांजरा, रेणा व तेरणा नदीवर २७ उच्चस्तरीय बंधाऱ्यांची (बॅरेज) उभारणी करण्यात आली आहे. पहिल्याच पावसानंतर तीनही नदीपात्रात चांगले पाणी आल्यामुळे हा बंधाऱ्यांमध्ये मोठा पाणीसाठा आला आहे.

बंधाऱ्यांत आतापर्यंत ३५ टक्के पाणीसाठा झाला असून सहा बंधारे निम्म्याहून अधिक भरले आहेत. दरम्यान पाणलोट क्षेत्र असलेल्या कळंब व वाशी तालुक्यात चांगला पाऊस होऊनही मांजरा धरणात अजून पाण्याची आवक सुरू झाली नाही. यामुळे पाणलोटात नसले तर लाभक्षेत्रात चांगले पाणी उपलब्ध झाले आहे.

मांजरा नदीवर धनेगाव (जि. बीड) येथे मांजरा धरण असून या धरणापासून लातूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत १५ उच्चस्तरीय बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली आहे. उच्चस्तरीय बंधाऱ्यांची संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी प्रत्यक्षात आणली. याच पद्धतीने तेरणा व रेणा नदीवर बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. पूर्वीच्या काही कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे उच्चस्तरीय बंधाऱ्यात रूपांत्तर करण्यात आले.

यामुळे नद्यांमध्ये बारमाही पाणी उपलब्ध होऊन नदीकाठच्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा झाला. मागील आठवड्यात दोन्ही जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे जमिनीच्या बाहेर पाणी पडून नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले. लाभक्षेत्रात या नद्या वाहिल्या. यामुळे बंधाऱ्यांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे.

यात बंधाऱ्यांसोबत रेणा मध्यम प्रकल्पात पाणी आले आहे. मांजरा नदीवरील १५ पैकी एक बंधारा कळंब तालुक्यात, दहा बंधारे लातूर तालुक्यात तर प्रत्येकी एक बंधारा शिरूर अनंतपाळ, देवणी, निलंगा व औसा तालुक्यात आहे. तेरणा नदीवरील नऊपैकी सहा बंधारे निलंगा, दोन बंधारे औसा तर एक बंधारा लोहरा तालुक्यात आहे.

सहा बंधाऱ्यांत अर्ध्याहून अधिक पाणी

मांजरा नदीवरील १५ बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता ६४.८४६ दशलक्ष घनमीटर असून आतापर्यंत त्यात २४.६३ दशलक्ष घनमीटर पाणी आले आहे. तेरणा नदीवरील ९ बंधाऱ्यांची साठवण क्षमता ११.७८३ दशलक्ष घनमीटर असून आतापर्यंत त्यात ३.०२० दशलक्ष घनमीटर पाणी आले आहे.

तर रेणा नदीवरील बंधाऱ्यात ०.८९१ पैकी ०.०१३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. मांजरा नदीवरील शिवणी (ता. लातूर), धनेगाव (ता. देवणी), भुसणी (तावरजा नदी, ता. औसा), तेरणा नदीवरील राजेगाव (ता. लोहारा), किल्लारी (ता. औसा) व लिंबाळा (ता. निलंगा) बंधाऱ्यात अर्ध्याहून अधिक पाणीसाठा आला आहे. तर वांजरखेडा, टाकळगाव व नागझरी बंधाऱ्यांत चाळीस टक्क्याच्या पुढे पाणी आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT