Bamboo Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Plantation: दमदार पावसामुळे बांबू लागवडीसाठी पोषक वातावरण

Satara Green: जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून ओढे-नाल्यांना पाणी वाहत आहे. बांबू लागवडीसाठी जमीनही उत्तम झाली असून कृषी, सामाजिक वनीकरण विभागाने तातडीने बांबू वृक्षाची लागवड करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

Team Agrowon

Satara News: जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून ओढे-नाल्यांना पाणी वाहत आहे. बांबू लागवडीसाठी जमीनही उत्तम झाली असून कृषी, सामाजिक वनीकरण विभागाने तातडीने बांबू वृक्षाची लागवड करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बांबू लागवड अभियान विषयक आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उप वन संरक्षक आदिती भारद्वाज, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, यांच्यासह आदी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कराड, पाटण खंडाळा, कोरेगाव, जावली या तालुक्यांमध्ये ४६.३० हेक्टरवर ३१ हजार ७३८ बांबू वृक्षाची लागवड करावयाची आहे. ही लागवड लवकरात लवकर पूर्ण करावी.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमार्फत बांबू लागवड करावयाची आहे. या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ज्या विभागांना दिलेले बांबू लागवडीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales : ट्रॅक्टर विक्रीने १० लाखांचा टप्पा ओलांडला; निर्यात एका लाखांच्या पार

Agrowon Samvad: ‘जमीन आरोग्य आणि पीक व्यवस्थापन’ विषयावर घाटनांदूरला बुधवारी चर्चासत्र

Turmeric Price Trend: जोखीम व्यवस्थापनासाठी वायदे बाजार आवश्यक

Agriculture Award: भाऊसाहेब माने प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

India Agriculture Growth: भारताच्या शेती क्षेत्राची १० वर्षांत ४.४२ टक्के दराने वाढ, चीनला मागे टाकले- नीती आयोग

SCROLL FOR NEXT