Devendra Fadanvis Agrowon
ॲग्रो विशेष

Lendi Project Victim : लेंडी धरणग्रस्तांना न्याय देण्यासाठी सरकारचे प्रयत्न

Devendra Fadanvis : राज्य सरकार लेंडी धरणग्रस्तांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल, असा विश्‍वास जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिला.

Team Agrowon

Nanded News : राज्य सरकार लेंडी धरणग्रस्तांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल, असा विश्‍वास जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिला. मागील ३८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांवर मुंबईत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.

या वेळी व्यंकटराव गोजेगावकर, गुणवंत पाटील हंगरगेकर, सुरेश पंदीलवाड, सुभाष बोधणे, उमाकांत वाकडे, गुणवंत पाटील वळंकी, मोतीराम आईलवाड, महादेव पंचडे, बालाजी पाटील, राजू पाटील रावणगावकर, निळकंठ देवकत्ते, एकनाथ भाटापूरकर, आनंद येरेवाड, निळकंठ पाटील, बाबूराव शेळके आदींची उपस्थिती होती.

शासन, प्रशासनासह नांदेड जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळींनी आतापर्यंत लेंडी प्रकल्पातील धरणग्रस्तांच्या मागण्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. यामुळे धरणग्रस्तांचे प्रश्‍न काही सुटले नाहीत. गेल्या ३८ वर्षांपासून शासनस्तरावर नवीन मागण्यासाठी लढत आहेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी आपण राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करू, आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व संसदेत करतो, त्यामुळे शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारे आर्थिक आणि मानसिक शोषण होऊ देणार नाही, असा विश्‍वास खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिष्टमंडळाला दिला. शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन दिले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT