Palkhed Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : अखेर पालखेड कालव्याला आवर्तन सुटले

Rabi Season : रब्बी हंगामासाठी पालखेड विभागाने सिंचन सोडावे, अशी मागणी गेल्या एक महिन्यापासून केली जात होती.

Team Agrowon

Nashik News : यंदा पावसाने दडी मारल्यानंतर भूजलपातळी कमी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पूर्व भागातील येवला व निफाड तालुक्यांतील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. खरीप कसाबसा उभा केला; त्यामुळे रब्बी हंगामासाठी पालखेड विभागाने सिंचन सोडावे, अशी मागणी गेल्या एक महिन्यापासून केली जात होती.

अखेर पाटबंधारे विभागाने मंगळवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता आवर्तन सोडले. पुढील ३० ते ३५ दिवस आवर्तन सुरू राहणार आहे. रब्बी हंगामातील शेतीसिंचनासाठी हे एकमेव असणार आहे. त्याचा काहीसा दिलासा टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

यंदा समाधानकारक पाऊस नसल्याने अनेक भागात विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके जगविताना संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे पालखेड पाटबंधारे विभागाने कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सिंचन द्यावे, अशीही मागणी येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी लावून धरली होती. मात्र निर्णय होत नव्हता. अखेर आता आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. लेट खरीप, रब्बी उन्हाळा कांदा यांसह हरभरा, गहू पिकांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे.

पालखेड पाटबंधारे विभागात धरणे तुडुंब भरल्याने पालखेड डाव्या कालव्याला शेतीसिंचनासाठी दोन आवर्तने सोडण्यात यावीत, अशी मागणी करत प्रहार शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. तर अलीकडेच शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे यांनी लाभ क्षेत्र विकास सचिव डॉ. संजय बेलसरे यांची भेट घेत आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. अखेर आंदोलनांनंतर दुष्काळी भागाला शेतीसाठी एकच आवर्तन सोडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याच पाण्यावर सिंचन नियोजन करावे लागणार आहे.

सध्या पाण्याची गरज सर्वांना पाणी मिळावे यासाठी अनधिकृत पाणी उपसा होणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. पाण्याचा काटेकोर वापर करून पिकांसह पिण्याच्या पाण्यासाठी वापर करण्यावर प्रत्येकाने भर द्यावा.
वैभव भागवत, कार्यकारी अभियंता-पालखेड पाटबंधारे विभाग
आंदोलन पाठपुरावा करून अखेर पालखेड डाव्या कालव्यास आवर्तन सुटले आहे, देर आए, दुरुस्त आए. मात्र आता प्रशासनाने योग्य नियोजन करून प्रत्येकाला पाणी मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनीही प्रशासनास सहकार्य करावे.
हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना-येवला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT