Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Management : ‘कृषी’कडून खरिपासाठी खतांचे नियोजन

Agriculture Department : खरिपात शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची अडचण येऊ नये यासाठी तीन महिने आधीच कृषी विभागाने नियोजन सुरू केले आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : खरिपात शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची अडचण येऊ नये यासाठी तीन महिने आधीच कृषी विभागाने नियोजन सुरू केले आहे. खत विक्रेत्यांच्या बैठका घेऊन उपलब्ध खताचे संकलन करून त्याची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे नेमके किती खत शिल्लक असून कितीची गरज आहे हे स्पष्ट होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.

सध्या खते उपलब्ध असल्याने आर्थिक क्षमता असलेल्या शेतकऱ्यांनी खते खरेदी करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. सुधाकर बोराळे यांनी सांगितले, की अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४ मध्ये एकूण खरीप पिकांचे ९ लाख ३२ हजार ३२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली होती. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आणि उडीद या पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर पेरणी झालेली होती.

त्यामुळे येत्या खरीप २०२५ हंगामाची पूर्वतयारी कृषी विभागामार्फत सुरू झालेली आहे. यामध्ये खरिपासाठी आवश्यक बियाणे व खते यांचा पुरवठा वेळेवर आणि मुबलक प्रमाणात होण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. सध्याचा विचार करता अहिल्यानगर जिल्ह्यात खतांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे.

युरिया २७ हजार ३३२ टन, एमओपी ११ हजार ४६२ टन, डीएपी ६१३५ टन, संयुक्त खते ४९ हजार ६५६ टन, सिंगल सुपर फॉस्फेट २१ हजार ४४१ टन इतका साठा शिल्लक असून, अंतिम बाबीत ६,६७० टन साठा नियोजनात उपलब्ध असेल असे दिसतेय. खरीप हंगामामध्ये मागील वर्षीप्रमाणे खताचे संरक्षित साठ्याचे नियोजन कृषी विभागामार्फत सुरू आहे.

खरीप हंगाम २०२५ मध्ये शेतकऱ्यांनी तयारीचा भाग म्हणून आपल्या जमिनीचा माती नमुना काढून तपासणी करून घ्यावी व त्यानुसार आपल्याला लागणाऱ्या खतांची खरेदी आताच करून घेतली म्हणजे पेरणीच्या वेळेवर होणाऱ्या गर्दीचा त्रास होणार नाही. तसेच शेतकरी बांधवांना आपल्याला येत्या खरीप हंगामामध्ये लागवड करण्यासाठी आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार पिकाची माहिती व त्यांच्या वाणाची माहिती कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभाग यांच्याकडून करून घ्यावी. कोणत्याही एका पिकातील वाणाचा आग्रह धरू नये.

कृषी निविष्ठा खरेदीत काही अडचण आल्यास तत्काळ नजीकच्या तालुका स्तरावरील कृषी विभागात संपर्क करावा, असे आवाहन बोराळे यांनी केले आहे. टंचाई निर्माण न पेरणीच्या वेळी वेळेत शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळावेत यासाठी कृषी विभाग नियोजन करत आहे.

खरीप हंगामामध्ये वेळेवर पाऊस झाल्यानंतर पेरणीचा हंगाम जोर पकडतो त्या वेळी सर्व शेतकरी बंधूंची कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी एकाच वेळी बाजारात कृषी सेवा केंद्रावर गर्दी होते. सध्या जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया व इतर रासायनिक खते उपलब्ध असल्याने आर्थिक क्षमता असलेल्या शेतकरी बांधवांनी आत्ताच खते खरेदी करून ठेवल्यास दोन हंगामात होणारी गर्दी व त्यातून उद्‍भवणारे गैरप्रकार टाळता येऊ शकतात.
- सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT