Agriculture Minister Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Minister Manikrao Kokate: खते लिंकींगमुळे शेतकरी हैराण – कृषिमंत्र्यांची कबुली!

Fertilizer Linking Issue: राज्यातील शेतकऱ्यांना खतांच्या लिंकींगमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. बांधावरील खरेदीतील फसवणुकीला आळा घालण्यासाठी कठोर कायद्यांची गरज असल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यस्तरीय पणन परिषदेत स्पष्ट केले.

गणेश कोरे

Pune News: खतांच्या लिंकिंगमुळे शेतकरी हैराण झाला आहे. शेतकरी विविध कारणांनी अस्वस्थ, अस्थिर असून अशा परिस्थितीत कृषी-पणन आणि पशुसंवर्धन विभागाने एकदिलाने काम करत, शेतकऱ्यांना अस्थिरतेतून बाहेर काढले पाहिजे, असे मत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.

राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय पणन परिषदेमध्ये सोमवारी (ता. २४) कृषिमंत्री कोकाटे बोलत होते. या वेळी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह पणन आणि बाजार समित्यांचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी मंत्री कोकाटे म्हणाले, ‘‘कृषी विभागाचा आणि शेतकऱ्यांचा आत्मा पणन विभाग आणि बाजार समित्या आहेत. शेतकरी मोठ्या हिंमतीने कष्टाने शेतीमाल पिकवितो. मात्र बाजार समित्यांमध्ये शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने तो हताश, अस्वस्थ आणि अस्थिर होतो. त्याचच खतांच्या लिंकिंगमुळे शेतकरी हैराण आहे. शेतीमालाचे दर पडले की शेतकऱ्यांचा रोष सरकावर येतो. कांदा, टोमॅटो सारख्या पिकांना कधीतरी चांगले दर मिळतात. मात्र आवक वाढली आणि दर पडले की कांदा आणि टोमॅटो फेकून द्यायची वेळ येते.’’

बांधावरील खरेदीमधील फसवणुकीबाबत मंत्री कोकाटे म्हणाले, ‘‘बांधावरच्या खरेदीमध्ये व्यापारी शेतकऱ्यांना दमदाट्या करून लुटणार करतात. व्यापारी फक्त स्वतःचा धंदा कसा वाढेल याचा विचार करत असतो. बांधावरील खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची बाजार समित्यांकडे नोंद हवी, त्यांची बॅंक गॅरंटी हवी. तसेच अनेक आणि कडक कायदे हवेत. फसविणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक होते. दोन दिवसांत जामिनावर तो व्यापारी बाहेर येतो आणि पुन्हा लूटमारीला येतो. हे टाळण्यासाठी कठोर कायद्यांची गरज आहे.’’

कृषी पदवीधर शेतीत नाही हे दुर्दैव

राज्यात अनेक कृषी महाविद्यालये, विद्यापीठे, कृषी अभियांत्रिकीही महाविद्यालये आहेत. यामधील केवळ २ टक्के पदवीधर थेट शेतीत येतात. मात्र ९८ टक्के पदवीधर अधिकारी होतात. हे दुर्दैव असून कृषी पदवीधारकांनी आधुनिक शेती करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा कृषिमंत्री कोकाटे यांनी व्यक्त केली.

गाळे विक्री करणे सभापतींचे काम नाही

शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये रास्त दर आणि संरक्षण मिळणे हे बाजार समित्यांचे काम आहे. मात्र बाजार समित्यांचे पदाधिकारी ‘वेगळा’ विचार करून बाजार समितीवर आलेले असतात. त्यामुळे गाळे बांधणे आणि विक्री करणे हे तुमचे काम नसून, कृषी विभागाच्या जागा शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दम दिला आहे. मस्ती कराल तर घरी जाल. आमचे पीएस आणि ओएसडी मुख्यमंत्रीच ठरवतात. निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. आपली एक सांगड जर या ठिकाणी चांगली बसली तर निश्चितपणे समाजात एक प्रकारचा स्थैर्य निर्माण होईल, शाश्वती निर्माण होईल. त्यातून आपल्याला विकासाकडे पुढे जाता येईल.
माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT