Mango and Cashew Agrowon
ॲग्रो विशेष

Jayprakash Chamankar : आंबा, काजूला हमीभावासाठी शेतकऱ्यांनी एकत्र यावे

Team Agrowon

Sindhudurg News :आंबा आणि काजू बीच्या दरातील चढउताराचा मोठा फटका उत्पादकांना बसत आहे. त्यामुळे या दोनही पिकांना हमीभाव मिळण्यासाठी जिल्ह्यातील उत्पादकांनी एकत्र यावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी केले.

वेंगुर्ले तालुका शेतकरी न्याय हक्क संघटना, आंबा-काजू उत्पादक संघ आणि भारतीय कृषक समाज, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

त्या वेळी चमणकर बोलत होते. बाळासाहेब परूळेकर, संजय गावडे, सुभाष नलंगे, निरंजन देसाई, उमेश नाईक, रमेश हिरवे, डॉ. राजेंद्र भिंगार्डे आदी उपस्थित होते.

चमणकर म्हणाले, की बदलत्या वातावरणाचा मोठा फटका आंबा-काजू उत्पादकांना बसत आहे. एकीकडे कीटकनाशके, खतांचे दर वाढलेले आहेत तर दुसरी उत्पादने कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहेत.

कधी कधी तर शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्चदेखील येत नाही. या सर्व परिस्थितीवर आता बागायतदारांनी विचार करण्याची गरज आहे. आंबा, काजूला हमीभाव मिळण्यासाठी बागायतदारांनी संघटितपणे चळवळ उभी केली पाहीजे. अन्यथा कधी हा प्रश्न सुटणार नाही. मेळाव्यात हिरवे यांनी काही पिकांच्या लागवडीविषयी मार्गदर्शनदेखील केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT