Agriculture Transformer Agrowon
ॲग्रो विशेष

Transformer Theft: पूर्व हवेलीत रोहित्र चोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत ३९ चोरी!

Farmer Issue: पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, थेऊर, कोरेगाव मूळ, टिळेकरवाडीसह पूर्व हवेलीतील नदी व कालव्याच्या पट्ट्यातील भागात विद्युत रोहित्र चोरांचा सुळसुळाट झाला आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, थेऊर, कोरेगाव मूळ, टिळेकरवाडीसह पूर्व हवेलीतील नदी व कालव्याच्या पट्ट्यातील भागात विद्युत रोहित्र चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे पाणी असून, पिकांना पाणी देता येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील सहा महिन्यांत ३९ रोहित्रांची चोरी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नदी पट्ट्यातील कोरेगाव मूळ, भिवरी, थेऊरसह परिसरातील गावांमधून रोहित्रांची चोरी सातत्याने होत आहे. अनेक गावांतील निर्मनुष्य भागातील तसेच नदीकाठचा भाग, गावापासून दूर असलेल्या वस्ती परिसरातील विद्युत रोहित्र चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

तांब्याचे वाढलेले भाव यामुळे चोरीचे प्रमाण वाढले असून याबाबत लोणी काळभोर, उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र पोलिस प्रशासन शोध घेत नसून याकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी शंका परिसरातील नागरिकांना येत आहे. चोरीचे तांबे विक्रेते आणि मोड घेणारे पोलिस खात्यास माहीत नाही का, अशी चर्चा नागरिक आपसांत करीत आहेत. सगळ्याच तक्रारी पोलिस ठाण्यात होत नाहीत. तसेच यामुळे शेतकऱ्यांच्या पिकास पाणी न मिळाल्याने शेतीमालाचे नुकसान होते.

तांबे ७०० रुपये किलो

चोर बाजारातील तांबे धातूचा भाव सुमारे ६०० ते ७०० रुपये प्रतिकिलो असल्याने रोहित्र चोरीचे प्रमाण वाढले आहे. एका विद्युत रोहित्रामध्ये सुमारे १०० ते १२० किलो तांबे असते. त्यामुळे एका विद्युत रोहित्र विक्रीतून सुमारे ७० ते ८० हजार रुपये मिळतात. काही वेळा ऑFलचीदेखील विक्री केली जाते.

अंधारात चोऱ्या वाढल्या

गेल्या सहा महिन्यात सुमारे ३९ विद्युत रोहित्र चोरीस गेले आहेत. नदीकाठ आणि दुर्गम भागात विद्युत रोहित्र चोरीचे प्रमाण अधिक आहे. नागरी भागाशिवाय चोरी होणाऱ्या‍ विद्युत रोहित्राच्या जागी नवीन जनित्र बसविण्यास दहा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे अंधारामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढू शकते.

रोहित्र चोरट्यांना जोपर्यंत कडक शासन होणार नाही, तोपर्यंत या रोहित्र चोरीच्या घटना होतच राहणार आहेत. सापडलेल्या अशा टोळ्यांवर शासनाने मकोका कारवाई करावी. या चोरांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आमदार रोहित्र बदलून देत आहेत. मात्र चोरीच्या घटनांही होत आहेत. त्यामुळे रोहित्र चोर पोलिसांनी गस्त वाढवून पकडावे व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे.
संतोष कांचन, माजी सरपंच, उरुळी कांचन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Government Decision: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगासाठी १ हजार रुपयांची वाढ; लाभार्थ्यांना मिळणार दरमहा २,५०० रुपये

Rajkumar Patel: मेळघाटचे माजी आमदार पटेल पाचव्यांदा पक्ष बदलाच्या तयारीत?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सातारा गॅझेटवर सर्वांच्या नजरा; काय आहे सातारा गॅझेट?

Cyber Security: सायबर सिक्युरिटीवरून जिल्हा बँक सभेत गोंधळ

Nanded Heavy Rainfall: कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT