Farm Loan Waiver Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Loan Waiver: कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली

High Court Petition: अकोल्‍यातील सुमारे साडेसहा लाख शेतकरी आठ वर्षांपासून शासनाच्या कर्जमाफी योजनेतून वंचित असून, २४८ शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने शासनाला १२ जूनपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

Team Agrowon

Akola News: शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीपासून राज्यातील सुमारे साडेसहा लाख शेतकरी आठ वर्षांपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण कारणीभूत असल्याचा आरोप करीत अडगाव बुद्रुक (जि. अकोला) येथील २४८ शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल केली आहे. यावर न्यायालयाने शासनाला १२ जूनपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक येथील सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटीच्या २४८ शेतकऱ्यांच्या वतीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. नापिकी, दुष्काळ, आत्महत्यांची वाढती संख्या लक्षात घेत शेतकऱ्यांचे थकित कर्ज माफ करून शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने शासनाने कर्जमाफी योजना तयार केली होती.

त्यानंतर मोठा गाजावाजा करत २८ जून २०१७ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची घोषणा केली. त्यात लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती. परंतु आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही सुमारे सहा लाख ५६ हजार शेतकरी सहा हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीपासून वंचित असल्याचे सांगितले जाते.

शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण असल्याने शासनाविरोधात अडगाव बुद्रुक सेंट्रल कृषक सोसायटीमधील कर्जमाफीपासून वंचित असलेल्या २४८ शेतकऱ्यांनी नागपूर खंडपीठाचे दरवाजे ठोठावले. न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांनी ही याचिका दाखल करून घेत राज्य शासनाला १२ जूनपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

कर्जमाफी मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार शेतकरी अन्याय निवारण कृती समितीमार्फत शासन दरबारी पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधींमार्फत सभागृहात आवाज उठविला, आंदोलने केली. परंतु या प्रकरणात काहीही झाले नाही. ॲड. अजय माहेश्‍वरी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष मनोहरलाल फाफट यांनी दिली.

आम्ही गेल्या आठ वर्षांपासून शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांबाबत शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध करतो. आमच्या संस्थेच्या २४८ शेतकऱ्यांसाठी सर्वंकष प्रयत्न करूनही कर्जमाफी झाली नाही. म्हणून आम्हाला न्यायालयात रिट याचिका दाखल करावी लागली.
मनोहरलाल फाफट, अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटी, अडगाव बुद्रुक, जि. अकोला
शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील साडेसहा लाख शेतकरी सहा हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीपासून वंचित आहेत. यासाठी शेतकरी अन्याय निवारण कृती समितीमार्फत शासन दरबारी खेटे घातले, दाद मागितली, आंदोलने केली. परंतु शासनाला जाग आली नाही म्हणून आता उच्च न्यायालयात न्याय मागण्यासाठी धाव घेतली.
अशोक घाटे, अध्यक्ष, शेतकरी अन्याय निवारण कृती समिती, अडगाव बुद्रुक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crisis : १७ सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर; कापूस धोरण, टॅरिफ आणि आत्महत्यावर शेतकऱ्यांशी संवाद

Maharashtra Health Scheme: कॅन्सर, हृदयविकार, किडनी आजारांवर आता गरीबांसाठी सरकारकडून मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा

Hingoli APMC Merger : हिंगोली, सिरसम कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकत्रीकरण

krushi Sakhi : कृषी सखींना लवकर मिळणार थकित मानधन

Manoj Jarange Patil: १७ सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा!

SCROLL FOR NEXT