Bribe News Agrowon
ॲग्रो विशेष

Bribe News : लाच प्रकरणात २६ वर्षांनंतर शेतकऱ्याची निर्दोष सुटका

Bribe Arrest : वन अधिकाऱ्याने सांगितले म्हणून गावातील एका व्यक्तिकडून पैसे स्वीकारणे एका शेतकऱ्याच्या अंगलट आले. ही रक्कम लाचेची असल्याने संबंधित अधिकाऱ्यांसह या प्रकरणात शेतकऱ्याला देखील अटक झाली.

Team Agrowon

Nagpur News : वन अधिकाऱ्याने सांगितले म्हणून गावातील एका व्यक्तिकडून पैसे स्वीकारणे एका शेतकऱ्याच्या अंगलट आले. ही रक्कम लाचेची असल्याने संबंधित अधिकाऱ्यांसह या प्रकरणात शेतकऱ्याला देखील अटक झाली. त्यानंतर २६ वर्षांनी या प्रकरणाचा निवाडा होऊन शेतकऱ्याला निर्दोष सोडण्यात आले. या प्रकरणी न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके यांनी निर्णय दिला.

वन विभागातील वनरक्षकाने मागितलेली लाचेपोटीची रक्कम नकळतपणे या शेतकऱ्याने स्वीकारताच त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईला सामोरे जावे लागले होते. २० जुलै १९९८ रोजी तक्रारदार व्यक्ती वनरक्षकाला बसस्थानकावर भेटला.

जंगलातून लाकूड आणून घरासाठी वापरल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले आणि पंधराशे रुपयांची मागणी केली. २९ जुलै १९९८ रोजी पीडिताने एसीबीकडे तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी, ३० जुलै रोजी एसीबी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत एक हजार रुपयांची रक्कम वनरक्षकाला देण्याचे ठरले.

परंतु, वनरक्षकाने ही रक्कम स्वत: न स्वीकारता गावातील एका शेतकऱ्याकडे सोपविण्यास सांगितले. शेतकऱ्याने रक्कम स्वीकारताच एसीबीने वनरक्षकासह या शेतकऱ्याला सुद्धा अटक केली आणि दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. एसीबी न्यायालयाने ३० जून २००६ रोजी दोघांनाही एका वर्षांची शिक्षा आणि पाचशे रुपये दंड ठोठावला होता. त्या विरोधात या दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शासनातर्फे ॲड. स्नेहा धोटे यांनी तर आरोपीतर्फे ॲड. ए. डी. डांगोरे यांनी बाजू मांडली.

शिक्षा देताना ‘या’ पैलुंचा विचार नाही

उच्च न्यायालयाने एसीबी न्यायालयाचा निर्णय रद्द करताना काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले आहे. या प्रकरणात ही रक्कम लाचेची असल्याचे दोषी शेतकऱ्याला ठाऊक नव्हते. तसा पुरावादेखील प्राप्त झाला नाही. तसेच, त्याने या रकमेची मागणीसुद्धा केली नव्हती. त्यामुळे, शिक्षा ठोठावताना न्यायालयाने या पैलुंचा विचारच केला नसल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले. शिवाय, दोषी सरकारी कर्मचारी देखील नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता.

...आता ५१ वर्षांचे

उच्च न्यायालयामध्ये २००६ पासून अपील अर्ज प्रलंबित असताना प्रकरणातील मुख्य आरोपी, वनरक्षकाचा मृत्यू झाला होता. त्या वेळी या शेतकऱ्याचे वय अवघे ३३ वर्षे होते. न्यायालयाने ठोठावलेल्या या शिक्षेविरोधात त्यांनी १८ वर्षे उच्च न्यायालयात लढा दिला. आता त्यांचे वय ५१ वर्षे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Market Rate : ११ महिन्यांनंतरही 'कापूस उत्पादकता अभियाना'ला मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतिक्षा; केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणा कागदावरच

Rabi Crop Insurance: सोलापूर जिल्ह्यातील केवळ ४३ हजार जणांनी भरला पीकविमा

Leopard Attack: डहाणूत बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू

Chikoo Farmers Issue: पालघरमधील चिकूच्या उत्पन्नाला कात्री

Flood Relief: जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून मदत

SCROLL FOR NEXT