Pune News: मावळमधील कुंडमळा येथील पूल कोसळल्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर जाण्यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
पर्यटन स्थळांची सुरक्षितता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.पावसाळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अनेक पर्यटक सुरक्षेचे नियम तोडतात, हुल्लडबाजी करतात आणि यामुळे दुर्दैवाने अनेकांना जीव गमवावा लागतो.
जीवघेण्या दुर्घटना आणि अपघातांच्या वाढत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याचे नवीन पर्यटन धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी झालेल्या घटना, पर्यटन स्थळावर असणाऱ्या त्रुटीचा अभ्यास करून हे धोरण ठरविले जाणार आहे.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, की जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर शुल्क आकारले जाणार असून, येत्या १५ दिवसांत पर्यटन धोरण ठरविले जाणार आहे. त्यात शुल्क किती असावे, पर्यटन स्थळावरील सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे असावी, याची माहिती असणार आहे.
वन विभाग आणि ग्रामपंचायत यांची संयुक्त समिती असणाऱ्या वन समितीमार्फत याची अंमलबजावणी केली जाईल. ही संयुक्त समिती पर्यटन स्थळावर सुरक्षेच्या उपाययोजना करेल. तिथे बॅरिकेड लावून पर्यटकांना उभे राहण्यासाठी सुरक्षित जागा तयार करेल.
एका वेळी तिथे किती पर्यटक असावेत, याचा निर्णय समिती घेईल. सातारा येथे जिल्हाधिकारी असताना पर्यटन स्थळावर अशाच उपाययोजना केल्या होती. त्याचा पर्यटकांना फायदा होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.