Farmer Income  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Income : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर द्या

Farmer Doubling Income : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध उपायांसह नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला पाहिजे, असा सल्ला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिला.

Team Agrowon

Akola News : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध उपायांसह नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला पाहिजे, असा सल्ला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिला. कृषी विभाग व आत्मा यंत्रणेच्या पुढाकाराने मंगळवारी (ता.७) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत जिल्हास्तरीय नैसर्गिक, सेंद्रिय शेती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून होते.

व्यासपीठावर जैविक मिशनचे सहसंचालक संतोष आळसे, वाशीम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ पसलावार, केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे यांची प्रमुख उपस्‍थिती होती.

डॉ. इंगळे यांनी मानवी उगमापासून केली जाणारी शेती ते आतापर्यंतच्या शेतीमध्ये कसे टप्प्याटप्प्‍याने बदल झाले हे स्पष्ट केले. काळानुरूप बदललेली शेतीपद्धती आज पुन्हा आपल्या परंपरागत पद्धतीकडे नेण्याची गरज व्यक्त केली.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय निर्धारीत करण्यात आलेले आहे. त्यादृष्टीने आपण सर्व यंत्रणांनी या सेंद्रिय- नैसर्गिक शेतीच्या विस्तारासाठी योगदान दिले पाहिजे, असे सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार पुढे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे. पण हे सहज शक्य नाही. उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार करताना नावीन्यपूर्ण उपक्रम कसे राबवता येतील ते पाहावे.

आज जिल्ह्यातील ६० ते ६५ टक्क्यांपेक्षा अधिक जनतेचे अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. कापसाचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन वाढले. याही पिकाची उत्पादकता, बाजारभाव लक्षात घेण्याची गरज आहे.

लागवड-देखभाल-काढणी-वाहतूक असा खर्च काढला तर शेतकऱ्याचा नफा किती आहे, हे दिसून येईल. सध्या कीटकनाशक, खतांचा वारेमाप वापर होतो. तरीही उत्पादन वाढीच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. बाजारपेठेत सेंद्रीय उत्पादनांना मागणी आहे.

ही शेतीपद्धती वाढविण्यासाठी शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. यासाठी लक्ष्यांक निर्धारित करून काम करा. जिल्ह्याचे काम पथदर्शी कसे होईल यासाठी प्रयत्न करावेत,’’ असे आवाहनही श्री. कुंभार यांनी केले.

विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. आळसे यांनी मिशनची संकल्पना समजावून सांगितली. श्री. शाह यांनी सेंद्रिय शेती योजनेची माहिती दिली. मिशनचे प्रकल्प व्यवस्थापक निखिल हुशंगाबादे यांनी सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाबाबत माहिती दिली.

जय किसान शेतकरी गटाचे संशोधन संचालक डॉ. संतोष चव्हाण यांनी शेत बांधावरील प्रयोगशाळेवर ऑनलाईन मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. उमेश ठाकरे, पंदेकृविचे शास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ पसलावार यांनीही मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल गोरे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT