River Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rain : पावसामुळे खानदेशातील प्रमुख नद्या झाल्या प्रवाही

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा अनेक सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यात काही प्रमुख नद्या मागील ३० ते ३५ दिवसांपासून प्रवाही झाल्या आहेत. तापी नदीला जुलैपासून प्रवाही पाणी आहे. गिरणा नदीतही मागील ३० ते ३५ दिवसांपासून प्रवाही पाणी असून, अधूनमधून हा प्रवाह कमी-अधिक होत आहे.

तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर प्रकल्पातून अनेक दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गिरणा नदीवरील गिरणा धरणातूनही विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीत पाणी आहे. तसेच जळगावातील वाघूर, कांग, सुकी, भोकर, गूळ, अंजनी आदी नद्यांतही पाणी आहे. धुळ्यातील पांझरा, अनेर या नद्यांही खळाळत आहेत. नंदुरबारातील सातपुड्यातील उदय, शहाद्यातील सुसरी, गोमाई नद्यांनाही प्रवाही पाणी आहे. तसेच लहान-मोठे नाले, नद्यांतही पाण्याचा प्रवाह आहे.

मागील हंगामात किंवा पावसाळ्यात अनेक नद्या कोरड्या होत्या. सिंचन प्रकल्पांची वानवा आहे. यंदा पाऊस चांगला असल्याने प्रकल्पांत जलसाठा ८० टक्क्यांपर्यंत आहे. नदीमधील जलसाठ्याच्या आधारावर नदीकाठचे शिवार हिरवे असते.

मागील वेळेस अनेक परंतु प्रमुख नद्या कोरड्याठाक पडल्या होत्या. यामुळे नदीकाठी काही दिवसांतच टंचाई तयार झाली होती. अनेक गावांत जानेवारीतच टंचाई होती. नद्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. यंदा नद्या प्रवाही झालेल्या असतानाच रब्बी पिके, भाजीपाला, फळबागांसाठी सिंचनाची लगबग सतत सुरू आहे. भूगर्भातील जलसाठा स्थिर आहे. कारण पाण्याचा उपयोग सध्या शिवारांत सुरू नाही. तापी, गिरणा, पांझरा नदीतून पाणी प्रवाह जोमात आहे.

वाळूउपसा काही भागात बंद आहे. कारण नदीत पाणी आहे. यामुळे नदीत पाणी मुरत आहे. तापीचे पाणी पुढे गुजरातेत वाहून जाते. यामुळे नदीच्या पाण्याचा उपयोग करा, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. नदीमधील मोठे डोह, वाळूउपशामुळे तयार झालेले मोठे खड्डे यात पाणी आहे. त्याचा उपयोग नदीकाठच्या विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण होण्यासाठी होणार आहे. नदीमधील पाणी पुढेही कायम राहणार आहे. पुढे गिरणा नदीत तीनदा पाणी सोडले जाईल. गिरणा, तापी, अनेर व पांझरा नदीकाठी टंचाई तयार होणार नाही, अशी स्थिती आहे. तसेच पिकांनाही पाणी मिळेल, स्थिती आहे. या महिन्यात पाणी नदीत कायम राहणार आहे. पुढे पाण्याचा उपयोग होईल.

नदीकाठी बहरली भाजीपाला पिके

नदीकाठी केळी, लिंबू, मोसंबी आदी बागा, भाजीपाला पिकेही असून, ती बहरली आहेत. सध्या केळी, भाजीपाला, कलिंगड लागवडीची तयारी शेतकरी करीत आहेत. तसेच तापी, गिरणा, पांझरा आदी नद्यांवर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी, कूपनलिका आहेत. त्यांच्या पुनर्भरणासाठी नदीत पाणी उपलब्ध असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment : बांबूच्या वस्तू निर्मितीतून आदिवासी महिला झाल्या कुशल

Sharad Pawar : साखरपट्ट्यातील आणखी एक दिग्गज नेता शरद पवारांच्या साथीला; अजित पवार यांना धक्का

Book Review : जगण्याचा आदीम तळ धुंडाळणारी रिंगाण

Haryana Assembly Elections : हरियाणात भाजपची हॅट्रीक हुकणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेस वरचढ; राज्यात झाले ६७ टक्के मतदान

Rainfed Farming Policy : कोरडवाहू शेतीचे शाश्‍वत धोरण कधी?

SCROLL FOR NEXT