Jalgaon News : तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. विहिरींच्या पाण्याच्या पातळीत तब्बल ४० ते ५० फुटांनी वाढ झाली. दोन वर्षांत प्रथमच विहिरी काठोकाठ भरल्या आहेत. त्यामुळे गिरणा परिसरात वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
सुमारे महिन्यापासून गिरणा परिसरात जोरदार पाऊस होत आहे. पावसाला सुरु झाल्यानंतर पावसाचा जोर कमी असल्याने विहिरींची पातळी पाहिजे तशी वाढत नव्हती. दोन वर्षांपासून जेमतेम वीस ते पंचवीस फूट विहिरी भरत होत्या.
परिणामी, उन्हाळ्यात एक- दोन तास तर काही ठिकाणी अक्षरशः पंधरा मिनिटे वीज पंप चालेल इतकाच पाणीसाठा विहिरीत शिल्लक असायचा. दिवसातून केवळ तास, दोन तास गुरांची तहान भागेल एवढेच पाणी शेतकऱ्यांना मिळत होते.
४८ विहिरींना फायदा
चाळीसगाव तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या एकूण २१८ विहिरी आहेत. यापैकी ४८ विहिरी गिरणा काठावर आहेत. मागीलवर्षी यापैकी बऱ्याच विहिरींनी अक्षरशः तळ गाठला होता. काही गावांना तर टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता.
या काळात कोरड्याठाक झालेल्या विहिरींच्या खोलीकरणाची कामे बहुतांश शेतकऱ्यांनी केली होती. आता या सर्व विहिरींना वर्षभर मुबलक पाणी राहणार असल्याने गिरणा पट्ट्यातील एकाही गावात यावर्षी पाणी टंंचाई जाणवणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.