Kharif Sowing: Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing: अतिपावसामुळे कोल्हापुरात २० हजार हेक्टर पेरणीविना

Kolhapur Agriculture: जिल्ह्यात पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. जुलैअखेरपर्यंत केवळ ८८.६७ टक्के क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित ११.३३ टक्के म्हणजेच सुमारे २० हजार ४८५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत.

Team Agrowon

Kolhapur News: जिल्ह्यात पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. जुलैअखेरपर्यंत केवळ ८८.६७ टक्के क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित ११.३३ टक्के म्हणजेच सुमारे २० हजार ४८५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे हे क्षेत्र खरिपासाठी वाया गेले आहे.

वाया गेलेल्या क्षेत्रात कडधान्ये, नाचणी, सोयाबीन, भुईमूग आणि भात यांचा समावेश आहे. जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के (३८७ मिमी) पावसाची नोंद झाली असली तरी, जुलैमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने केवळ ४९.२ टक्के (२२७.६ मिमी) इतकाच पाऊस झाला. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांची वाढ खुंटली, रोपवाटिकांचेही नियोजन कोलमडले आहे. अनेक ठिकाणी जमिनीची वाफसास्थितीच तयार होऊ शकली नाही.

जिल्ह्यात १ लाख ८० हजार ७४७ हेक्टर क्षेत्र खरिपासाठी राखीव ठेवले होते. यापैकी केवळ १ लाख ६० हजार २६२ हेक्टरवरच पेरण्या झाल्या. त्यामुळे खरीप हंगामाचे उत्पादन मोठ्या संकटात सापडले आहे. तृणधान्यांची ९२.१ टक्के, कडधान्यांची फक्त ४९.२८ टक्के, तर तेलबियांची ८४.६२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

विशेषतः भात, ज्वारी, नाचणी, सोयाबीन, भुईमूग व कडधान्यांची पेरणी रखडली आहे. याशिवाय पावसाच्या विश्रांतीमुळे सोयाबीन व भुईमूग पिकावर पाने खाणारी व केसाळ अळी, तसेच उसावर पांढरी माशी व हुमणी यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

दरवर्षी कोल्हापूर जिल्हा ऊस उत्पादनात आघाडीवर असतो. यंदाही १ लाख ९८ हजार ६०४ हेक्टर क्षेत्र उसासाठी राखीव होते. त्यात १२ हजार ३८९ हेक्टरने वाढ झाली आहे. मात्र, खरिपाच्या इतर पिकांच्या स्थितीमुळे शेतीचे एकंदरीत गणित कोलमडले असून, उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

१ लाख ६० हजार २६२ हेक्टरवरच पेरण्या

जिल्ह्यात १ लाख ८० हजार ७४७ हेक्टर क्षेत्र खरिपासाठी राखीव ठेवले होते. यापैकी केवळ १ लाख ६० हजार २६२ हेक्टरवरच पेरण्या झाल्या. त्यामुळे खरीप हंगामाचे उत्पादन मोठ्या संकटात सापडले आहे. तृणधान्यांची ९२.१ टक्के, कडधान्यांची फक्त ४९.२८ टक्के, तर तेलबियांची ८४.६२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : नांदेडला ज्वारी, उडीद, मुगाच्या पेरणीत यंदाही घट

Solar Power : सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये होतेय सौर ऊर्जेवर वीजनिर्मिती

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १४ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Dairy App: जनावरांचं संपूर्ण नियोजन कसं करावं?

Varkhede Barrage : शेळगाव, वरखेडे प्रकल्पांत जलसंचय यंदाही १०० टक्के अशक्य

SCROLL FOR NEXT