Wild Animal Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal Crop Damage : वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान

Crop Damage Update : खानदेशात रब्बी हंगाम जेमतेम आहे. त्यात वन्यप्राणी पिकांचे मोठे नुकसान करीत आहेत. त्यात अनेकांचे २५ ते ३० टक्के पीक हातचे गेले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बी हंगाम जेमतेम आहे. त्यात वन्यप्राणी पिकांचे मोठे नुकसान करीत आहेत. त्यात अनेकांचे २५ ते ३० टक्के पीक हातचे गेले आहे. खानदेशात नोव्हेंबरमध्ये आलेल्या पावसाने रब्बीतील काही पिकांना लाभ झाला तर काही पिकांची हानी झाली. हरभरा पिकाची काहींना दुबार पेरणी करावी लागली. कसेबसे गहू हरभरा पीक सावरले.

त्यात रोही, हरिण, रानडुक्कर या वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरू आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना रात्रंदिवस खडा पहारा द्यावा लागत आहे.सातपुडालगत व गिरणा, अनेर, तापी, पांझरा आदी नद्यांच्या भागातील शेतकरी या समस्येमुळे मेटाकुटीस आले आहेत.

वारंवार तक्रार देऊनही दखल घेतली जात नाही. मेहनत करून उभे केलेले पीक डोळ्यादेखत जमीनदोस्त होत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी दमछाक होताना दिसून येत आहे. परंतु वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

तारेचे कुंपण करण्याचा प्रस्ताव द्या

जिल्ह्यात यावल अभयारण्य आहे. तसेच सातपुड्यातही वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. वन परिक्षेत्राला वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी तार कंपाउंड करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा वन विभागाने सादर करण्याची मागणी केली जात आहे.

मका, गहू, हरभरा, केळी, भाजीपाला पिके आदींची मोठी हानी होत आहे. इतर भागातही रानडुकरांचा मोठा त्रास आहे. रोही, हरिण, रान डुक्कर आदी वन्यप्राण्यांचा लोणी बू.सह परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. .

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT