Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा अर्जातील चुकांना ‘सीएससी’चालक जबाबदार

Agriculture Department : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी संकेतस्थळावर अर्ज भरताना ऑनलाइन चुका केल्यास सार्वजनिक सुविधा केंद्रचालक (सीएसएसी) जबाबदार असेल, असे कृषी खात्याने स्पष्ट केले आहे.

Team Agrowon

Pune News : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी संकेतस्थळावर अर्ज भरताना ऑनलाइन चुका केल्यास सार्वजनिक सुविधा केंद्रचालक (सीएसएसी) जबाबदार असेल, असे कृषी खात्याने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांच्या नावाखाली चुकीची माहिती देत सर्रास नुकसान भरपाई लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची काही प्रकरणे उघडकीस आली आहेत. अशा प्रकरणांमध्ये संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करताना त्रुटी ठेवल्या किंवा चुका केल्यास जबाबदारी पूर्णतः आपले सरकार सुविधा केंद्राची राहणार आहे. अशा चुकांवर आधारित प्रस्तावांमार्फत विमा कंपन्यांना दावे द्यावे लागल्यास त्यालाही केंद्रचालकच जबाबदार असतील, असे कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शेतकऱ्यांचा अर्ज भरण्यासाठी केंद्रचालकाला शुल्क मिळते. त्यामुळे मुद्दाम चुका करून मूळ शेतकरी विम्यापासून वंचित राहणार नाही किंवा चुकीच्या प्रस्तावाखाली भलत्याच व्यक्तीला लाभ होणार नाही, याचे भान केंद्रचालकांना ठेवावेच लागेल. काही जिल्ह्यांमध्ये विमा भरल्याच्या बनावट पावत्या आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याने सादर केलेला नोंदणी अर्ज तसेच त्यासोबत दिलेली अत्यावश्यक कागदपत्रे किमान दोन वर्षे जतन करून ठेवणे बंधनकारक आहे.

पावती बनावट असल्याचा संशय आल्यानंतर अशा प्रकरणामध्ये पोलिसांना तपास करणे शक्य होते. बनावट पावत्यांच्या आधारे गैरव्यवहार करीत विमा कंपनीकडून पैसे काढले जातात. अशा नुकसान भरपाईला शासन नव्हे; तर केंद्रचालकच जबाबदार धरला जाणार आहे.

पीकविमा योजनेत गावपातळीवरील सेवा केंद्रांनाही काही अटी टाकण्यात आल्या आहेत. विमा योजनेच्या संकेतस्थळावरील अत्यावश्यक माहिती भरण्याची जबाबदारी शेतकऱ्याच्या वतीने केंद्रचालकाचीच आहे. या केंद्रांना प्रत्येक अर्जापोटी अधिकृत शुल्क दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कोणतेही अन्य शुल्क किंवा वाहन शुल्क वसूल करता येणार नाही, अशी तंबी या केंद्रचालकांना देण्यात आली आहे.

माहिती चुकल्यास बॅंकांना सेवाशुल्क नाही

राज्यातील शेतकऱ्यांचे पीकविमा प्रस्ताव तयार तयार करणाऱ्या बॅंकांना विमा हप्ता रकमेच्या चार टक्के रक्कम सेवाशुल्क म्हणून विमा कंपनी देते. शुल्क देण्यास उशीर झाल्यास १२ टक्के व्याजदेखील बॅंकांना मिळते. त्यामुळे विमा प्रस्ताव बिनचूक भरण्याची जबाबदारी बॅंकांवरच आहे. प्रस्ताव चुकीचे असल्यास बॅंकांना अजिबात शुल्क अदा न करू नका, असे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT