Rahul Gandhi 
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi : 'ही निवडणूक विचारधारेची, पंतप्रधान भ्रष्टाचाराचे चॅम्पियन' : राहुल गांधी

Aslam Abdul Shanedivan

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून अनेक ठिकाणी प्रचार सभांना रंग चढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून इंडिया आघाडीवर वारंवार टीका केली जात असतानाच काँग्रेस आणि मित्र पक्षांकडून याला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. यादरम्यान उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे बुधवारी (ता. १७) पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली. यावेळी राहुल गांधी यांनी, २० ते २५ लोकांकडेच देशातील पैसा आहे. मात्र सर्वसामान्यांकडे पैसा नाही. यामुळे गरिबीवर बोलणे गरजेचे आहे, अशी टीका केली आहे.

पुढे राहुल गांधी म्हणाले, आज शेतकऱ्यांच्या योग्य भाव मिळत नसून शेतकरी हमीभावाची मागणी करत आहे. पेपरफुटीने तरूण त्रस्त झाले आहेत. पण आम्ही पेपरफुटीवर कायदा करू. ही निवडणूक विचारधारेची निवडणूक आहे. भाजप आणि आरएसएस हे संविधान आणि लोकशाही नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण आम्ही इंडिया आघाडी म्हणून संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काम करत आहोत. या निवडणुकीत तीन एक मुद्दे महत्वाचे आहेत. यात बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा असून महागाई दुसरा मुद्दा आहे. मात्र मोदींना याचे काही पडलेले नाही. या मुद्द्यांवर ना पंतप्रधान बोलतात ना भाजप, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

गेल्या १० वर्षात मोदींनी नोटाबंदी केली. चुकीचा जीएसटी लादून अदानीसारख्या मोठ्या अब्जाधीशांना मोठे केले. रोजगार निर्मिती थांबवली. यामुळे पुन्हे रोजगार मजबूत करणे हे आम्ही आमचे काम समजतो. आमच्या जाहीरनाम्यात २३ आश्वासने देण्यात आली आहेत. यात उत्तर प्रदेशातील सर्व पदवीधरांना आणि डिप्लोमाधारकांना प्रशिक्षण देण्यासह दर वर्षी १ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच पेपरफुटीवर आम्ही कायदा करू असेही आश्वासन देण्यात आले आहे आणि आम्ही तो कायदा करू असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी एएनआयला एक खूप मोठी मुलाखत दिली होती. जी स्क्रिप्टेड होती, पण तो फ्लॉप शो होता. पंतप्रधानांनी आपल्या मुलाखतीत इलेक्टोरल बाँड्सचा मुद्दा सांगितला. मात्र इलेक्टोरल बाँड्समधील पारदर्शकता, राजकारण यावर ते बोलले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ती व्यवस्था का रद्द केली यावर ते बोलत नाहीत. जर इलेक्टोरल बाँड्समधील पारदर्शकतेचा विषय असेल तर त्यांनी भाजपला पैसे देणाऱ्यांची नावे का लपवली? ही जगातील सर्वात मोठी खंडणी योजना असून आता इलेक्टोरल बाँड्समधील सत्य सर्व उद्योगपतींना समजले आहे. पंतप्रधानांनी आता कितीही स्पष्टीकरण दिले तरी काही फरक पडणार नाही. कारण संपूर्ण देशाला माहित आहे की पंतप्रधान हे भ्रष्टाचारातील चॅम्पियन आहेत.

यावेळी अखिलेश यादव यांनी गाझियाबादमध्ये पत्रकार परिषद घेण्यामागचे कारण सांगताना, एनडीएचा गाझियाबाद ते गाझीपूरपर्यंत सफाया होणार आहे. यूपीचे लोकही आमचे चांगले स्वागत करत आहेत. तर इंडिया आघाडी लोकांची नवी आशा आहे. दारिद्र्य निर्मूलनासाठी आमच्या जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आल्याचे सांगितले.

तसेच शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे आम्ही इंडिया आघाडीतील मित्र पक्ष देखील एमएसपीची हमी देण्याचे आश्वासन देत आहोत. कारण भाजपची सर्व आश्वासने खोटी ठरल्याने आज शेतकरी चिंतेत आहेत. इलेक्टोरल बाँड्सने भाजपचा बँड वाजवला आहे. भाजप सर्व भ्रष्टाचाऱ्यांचे कोठार बनले आहे असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT