Jal Jeevan Mission  Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jeevan Mission : झिरवाळ यांच्या नाराजीनंतर ‘त्या’ कामांची चौकशी

Rural Water Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलजीवन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत जिल्ह्यात तक्रारी वाढत आहेत. आजही अनेक तालुक्यांत महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

Team Agrowon

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलजीवन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत जिल्ह्यात तक्रारी वाढत आहेत. आजही अनेक तालुक्यांत महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

या सर्व प्रकारावर राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना योजना ‘फेल’ गेल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वतःच जलजीवन मिशनमध्ये लक्ष घालताना योजनेच्या कामांची पाहणी व चौकशी करण्याचा निर्णय घेतला.

प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दाखविले. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशनच्या माध्यमातून वाड्या-वस्त्यांवरील घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचविताना प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी दिले जाईल, अशी घोषणा करण्यात आली; परंतु अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे जिल्ह्यात योजनेला घरघर लागल्याची चित्र आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात एक हजार ४१० कोटी रुपयांच्या एक हजार २२२ योजनेच्या कामांना मान्यता देण्यात आली. पण सध्या केवळ २४१ कामे पूर्ण झाली आहेत. जी काही कामे पूर्ण त्यातही अनियमितता असल्याची ओरड होत आहे.

आजही ७८७ गावांमध्ये योजना कागदावरच असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वरमध्ये जलजीवनच्या अनुक्रमे ९१ व ८५ योजना राबविल्या. पण इगतपुरीत आजही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे.

जलजीवनच्या कामातील अनियमितता, चुकीच्या पद्धतीने राबविलेली योजना, पाण्याचे स्रोत न पाहता करण्यात आलेली कामे अशा विविध कारणांनी ही योजना सपेशल अपयशी ठरत आहे. खुद्द मंत्री झिरवाळ यांनीही योजना फेल गेल्याचे वक्तव्य केले आहे.

त्यामुळे जलजीवनबाबतच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठवड्यात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन ते कामांची पाहणी करणार आहेत.

जलजीवन मिशनच्या कामांबाबत अनेक तक्रारी प्राप्त आहेत. त्यामुळे योजनेचा आढावा घेतला जाईल. योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत माहिती जाणून घेतली जाणार आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणार असून, त्यानंतरच योजनेतील उणिवा व त्रुटी समोर येतील.
-जलज शर्मा, जिल्हाधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT