Bhimashankar Sugar Mill Agrowon
ॲग्रो विशेष

Bhimashankar Sugar Mill: ‘भीमाशंकर’चा प्रतिटन २१० रुपयांचा हप्ता जाहीर

Sugarcane Farmers: आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने २०२४-२५ गाळप हंगामासाठी अंतिम दर ३,२९० रुपये प्रतिटन जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १९ कोटी ९२ लाख रुपयांचा अंतिम हप्ता थेट खात्यात वर्ग केला जाणार आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संस्थापक-संचालक व माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार मागील २०२४-२५ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम हप्ता २१० रुपये प्रतिटनासह अंतिम ऊसदर ३,२९० रुपये प्रतिटन जाहीर केल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.  

भीमाशंकर कारखान्याने २०२४-२५ गाळप हंगामात कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या संपूर्ण ११ लाख ३८ हजार ४९६ टन उसासाठी यापूर्वी एफआरपीनुसार ३,०८० रुपये प्रतिटनाप्रमाणे एकूण ३५० कोटी ६६ लाख रुपये रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. 

अंतिम हप्ता २१० रुपये प्रतिटन निश्‍चित केला असून, शिक्षण संस्था निधी १० रुपये प्रतिटन व भाग विकास निधी २५ रुपये प्रति टनाप्रमाणे ३५ रुपये प्रति टन वजा जाता उर्वरित १७५ रुपये प्रति टन अंतिम हप्त्याची एकूण रक्कम १९ कोटी ९२ लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळी सणापूर्वी वर्ग करणार आहे.

कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर दिलेला असून, यापुढेही ही परंपरा कायम राहील. तरी गाळप हंगाम २०२५-२६ करिता कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादकांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्याची भावना ठेवावी, असे आवाहन बेंडे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crisis : १७ सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर; कापूस धोरण, टॅरिफ आणि आत्महत्यावर शेतकऱ्यांशी संवाद

Maharashtra Health Scheme: कॅन्सर, हृदयविकार, किडनी आजारांवर आता गरीबांसाठी सरकारकडून मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा

Hingoli APMC Merger : हिंगोली, सिरसम कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकत्रीकरण

krushi Sakhi : कृषी सखींना लवकर मिळणार थकित मानधन

Manoj Jarange Patil: १७ सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा!

SCROLL FOR NEXT