Banana crop insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Insurance : केळी विमा प्रश्न तापू लागला

Crop Insurance Scheme : जिल्ह्यात फळ पीकविमा योजनेत ऑक्टोबर २०२२ मध्ये सहभागी झालेल्या ७७ हजार ८०० शेतकऱ्यांना परतावे मिळालेले नाहीत.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात फळ पीकविमा योजनेत ऑक्टोबर २०२२ मध्ये सहभागी झालेल्या ७७ हजार ८०० शेतकऱ्यांना परतावे मिळालेले नाहीत. प्रशासन व शासन याबाबत योग्य माहिती देत नसून, ठोस निर्णयही घेत नाही.

यामुळे मंगळवारी (ता. ३) रावेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात केळी उत्पादक व विमाधारक मोर्चा काढणार आहेत. तसेच जळगाव येथे जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना शेतकरी निवेदन देणार आहेत.

फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या किती शेतकऱ्यांना परतावे मिळतील, हे स्पष्ट झालेले नाही. शासन ३७ हजार हेक्टर एवढ्या केळी पिकासाठी विमा संरक्षित क्षेत्राबाबत पुन्हा पीक पडताळणी करणार आहे, ही पडताळणी आता कशी शासन करू शकते, कारण विमा संरक्षण कालावधी संपला आहे.

अनेक शेतकऱ्यांचे केळी पीक शेतातून काढणी होवून शेतात कुठलेही अवशेष नाहीत, नऊ महिन्यांचा केळी पिकाचा विमा संरक्षण कालावधी ३१ जुलै २०२३ रोजी संपला आहे. यानंतर ४५ दिवसांत पात्र विमाधारकांना परतावे देणे अपेक्षित होते. परंतु हे परतावे सप्टेंबर महिना संपला तरीदेखील मिळालेले नाहीत.

शासन व प्रशासन यांच्यात समन्वय नाही. शेतकरी यात संभ्रमात आहेत. कोंडी व संताप तयार होत असून, तातडीने यासंबंधी कार्यवाही करून शेतकऱ्यांना परतावे मिळावेत यासाठी रावेरात शेतकरी संघर्ष समिती सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चा काढणार आहे.

तसेच जळगाव येथे जिल्हाधिकारी यांना केळी विमाधारक शेतकरी सकाळी ११ वाजता निवेदन देतील. या निवेदनाची दखल न घेतल्यास ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा भूषण पवार यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pauas Andaj: काही भागात हलक्या पावसाचा अंदाज; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज

Cooperative Bank Jobs: भरतीमध्ये भूमिपुत्रांसाठी ७० टक्के जागा राखीव

Yashwantrao Krishi Mahotsav: राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सवाला प्रतिसाद

Ratnagiri Farmers Crop Loss : रत्नागिरी जिल्ह्यात ४ हजारांवर शेतकऱ्यांचे ७७२ हेक्टरचे नुकसान

Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत २१ निर्णय; अतिवृष्टीच्या मदतीवरून खडाजंगी

SCROLL FOR NEXT