Balganga Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Balganga Dam : बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे हाल; सरकारच्या उदासीनतेवर टीका

Project Affected Communities : पेण तालुक्यातील बाळगंगा धरणाचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे, मात्र येथील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही तसेच असल्याने शासनाच्या उदासीन धोरणावर टीका करण्यात येत आहे,

Team Agrowon

Pen News : पेण तालुक्यातील बाळगंगा धरणाचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे, मात्र येथील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही तसेच असल्याने शासनाच्या उदासीन धोरणावर टीका करण्यात येत आहे, शिवाय बाळगंगा धरणाचे कामदेखील रखडले असल्याचे बोलले जात आहे.

तर या धरण प्रकल्पाबाबत मागील १५ ते १६ वर्षे रखडलेल्या कामामुळे येथील प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असून, यामध्ये आदिवासी समाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्‍यामुळे शासनाने अधिक लक्ष देत उर्वरित शिल्लक राहिलेले धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांनी विधिमंडळात नुकताच प्रश्न उपस्थित केला आहे.

तालुक्यातील बाळगंगा धरणासाठी जावळी, वरसई, करोटी, निधवली, गागोदे, वाशिवली या एकूण सहा ग्रामपंचायती हद्दीतील नऊ महसुली गावे आणि १३ आदिवासी वाड्यांचा यात समावेश आहे. तसेच जवळपास तीन हाजारांहून अधिक कुटुंबे विस्थापित होणार आहेत. विशेष म्हणजे या प्रकल्पात आदिवासी समाजाची संख्या लक्षणीय आहे. त्‍यामुळे बाळगंगा धरण प्रकल्पासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत.

मात्र शासनाने त्‍यांच्याकडे अद्यापही लक्ष न दिल्यामुळे येथील अनेक समस्या आजही तशाच पडून आहेत. त्यातच शासनाकडून येणारे अनेक उपक्रम इतर भागांमध्ये राबविले जातात, परंतु या भागात राबवता येत नसल्याने येथील शेतकरीबांधवांना अनेक योजनेपासून वंचित राहावे लागले आहे.

त्यामुळे मागील १५-१६ वर्षे या बाधित धरण प्रकल्पग्रस्तांच्या गावांचे आजतागायत पुनवर्सन तसेच योग्य जमिनीचा मोबदला, पुनर्वसनासाठी प्लॉटचे वाटप, घरांच्या किमती, पुनर्वसन आराखडा आदी सर्व प्रश्न अद्यापपर्यंत सुटलेले नाहीत. त्‍यामुळे शासनाच्या उदासीनतेमुळे बाळगंगा धरणाचे काम रखडले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सरकारने बाळगंगा धरण प्रकल्पाची सुरुवात तत्काळ करावी व धरण पूर्ण करून प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. बाळगंगा धरण प्रकल्पाबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर जानेवारी महिन्यातच बैठक झाली आहे.

बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे सरकारने लक्ष देऊन येथील कामे पूर्ण करावीत. पेणमध्ये निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री यांनी लवकरच बाळगंगा धरणाचा प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले होते. त्यानुसार पुनर्वसन करताना स्मार्ट गावे करावीत. त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा असणे आवश्यक आहे.
-अविनाश पाटील, अध्यक्ष, बाळगंगा धरण संघर्ष व पुनर्वसन समिती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार; २०२२ ते रब्बी २०२४-२५ ची भरपाई मिळणार

Agrowon Podcast: कापूस दर दबावातच; उडद- ढोबळी मिरचीचे भाव स्थिर, काकडीचे दर नरमले, तर पेरुचा आवक स्थिर

Ragi Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी रोप लागवड पूर्ण

Solar Power: सांगली, कोल्हापुरात ‘सौर कृषिवाहिनी’ योजनेला गती द्या; लोकेश चंद्र

Monsoon Rain: आज, उद्या राज्यात पावसाची शक्यता; विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT