Chh. Sambhajinagar News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बदनापूर, जि. जालना येथील कृषी संशोधन केंद्र अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प खरीप कडधान्ये अंतर्गत ‘सर्वोत्तम केंद्र’ ठरले आहे. ७ ते ९ मे दरम्यान जयपूर येथे सुरू झालेल्या वार्षिक संशोधन गट बैठकीत ही घोषणा करत पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
माहितीनुसार, देशपातळीवर खरीप कडधान्ये यावर एकूण ३५ केंद्रे कार्यरत असून त्यामधून बदनापूरचे कृषी संशोधन केंद्र यंदा सरस ठरले आहे. केंद्राला मिळालेला हा पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर मोठा सन्मान समजला जातो. हा पुरस्कार जयपूर येथे सुरु असलेल्या गट बैठकीत बुधवारी (ता. ७) भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. मांगी लाल जाट यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी पीक विज्ञानचे सह महासंचालक डॉ. डी. के. यादव, कडधान्येचे सहायक महासंचालक डॉ. संजीव गुप्ता, कडधान्येचे संचालक डॉ. जी. पी. दीक्षित, तसेच अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प - खरीप कडधान्येचे प्रकल्प समन्वयक डॉ. आदित्य प्रताप आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारते वेळी बदनापूर कृषी संशोधन केंद्राचे डॉ. दीपक पाटील, डॉ. किरण जाधव, डॉ. विष्णू गिते, डॉ. प्रशांत सोनटक्के, डॉ. प्रशांत पगार, डॉ. पतंगे आदींची उपस्थिती होती.
मानाचा असलेला हा पुरस्कार कडधान्य पिकांच्या, विशेषतः तूर पिकाच्या नवीन जातींच्या विकासामधील महत्त्वपूर्ण योगदान, तसेच पूर्वजनुकीय संशोधन (pre-breeding), वनस्पती संरक्षण व वनस्पती उत्पादन या क्षेत्रांतील उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी प्राप्त झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.