Crop Insurance For Citrus Crop : लिंबू पिकासाठी मृग बहरासाठी योजना अधिसूचित जिल्हा, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रामध्ये नोंदवल्या गेलेल्या हवामान तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. लिंबू पिकास नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) विमा संरक्षण प्रदान होईल. लिंबू बाग चार वर्ष पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम बागेस विमा संरक्षण राहील.
१) विमा संरक्षण रक्कम
प्रती हेक्टरी ः ८०,००० रुपये
२) भाग घेण्यासाठी
अंतिम दिनांक ः ३० जून २०२५
३) शेतकऱ्यासाठी विमा
हप्ता ः ४००० रुपये प्रती हेक्टरी.
या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आवश्यक आहे.
या योजनेत सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात. पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in
आवश्यक कागदपत्रे ः ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा, पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅग केलेला फोटो, बँक पासबुकवर खात्याबाबत सविस्तर माहिती. कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील. विमा योजनेत समाविष्ट जिल्हे आणि संबंधित कंपनी
या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी फळपीक लागवड केलेली नसताना किंवा उत्पादन योग्य फळपीक नसताना, दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा शासनाच्या जमिनीवर, अकृषक जमिनीवर विमा काढून विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.
शेतकऱ्यांनी फक्त स्वतःच्या जमिनीवर विमा घ्यावा. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी बंधनकारक आहे. ई-पीक पाहणी आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज केव्हाही रद्द होऊ शकतो. एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक अधिसूचित फळपिके असल्यास तो या सर्व पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो.
या योजनेत प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागासाठी एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे आणि उर्वरित विभागासाठी कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे (०.२० हे.) अशी मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी चार हेक्टर मर्यादेपर्यंत राहील.
विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते, आधार कार्ड पेमेंटसाठी लिंक असावे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.
हवामान धोका व कालावधी आणि प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति/हेक्टरी)
कमी पाऊस ः १५ जून ते १५ जुलै ः या कालावधीमध्ये १०० मि.मी. आणि त्यापेक्षा कमी पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम ४०,००० रुपये देय होईल. या कालावधीत १०० मि.मी.पेक्षा जास्त १५० मि.मी.पर्यंत पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम २०,००० रुपये देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. ४०,००० रुपये)
पावसाचा खंड ः १६ जुलै ते १५ ऑगस्ट ः सदर कालावधीमध्ये सलग १५ ते २१ दिवसांचा पावसात खंड पडून दिवसाचे जास्तीत जास्त तापमान कोणत्याही दिवशी ३५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम २०,००० रुपये देय राहील. सदर कालावधीत सलग २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यास तसेच दिवसाचे जास्तीत जास्त तापमान सलग ३ दिवस ३५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास ४०,००० रुपये नुकसान भरपाई देय राहील.२.५ मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडला तरी तो खंड समजण्यात येईल.(कमाल नुकसान भरपाई रक्कम ४०,००० रुपये)
- विनयकुमार आवटे, ९४०४९६३८७०
(कृषी संचालक (नियोजन व प्रक्रिया), कृषी आयुक्तालय, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.