Ramesh Bais Agrowon
ॲग्रो विशेष

Ramesh Bais : भारताला कृषिक्षेत्रात आत्मनिर्भरतेची संधी

Team Agrowon

Ratnagiri News : बदलते वातावरण हे कृषी समोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यावर मात करण्यासाठी कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना विस्तृत माहिती देऊन सजग ठेवावे. कृषी विद्यापीठांनी केलेल्या संशोधन आणि विस्तार कार्यामुळे देश कृषी क्षेत्रात अग्रेसर असून २०४७ पर्यंत विकसित भारताला कृषिक्षेत्रात आत्मनिर्भर आणि जगाचे अन्नकेंद्र म्हणून उदयास येण्याची संधी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी दापोली येथे सोमवारी (ता. १८) केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ४२ व्या पदवीप्रदान समारंभप्रसंगी दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यपाल बैस बोलत होते. हा कार्यक्रम कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

प्रमुख पाहुणे म्हणून रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबईचे माजी कुलगुरू पद्मभूषण प्रा. जेष्ठराज जोशी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत शहारे,

मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधाकर इंदुलकर, वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सतीश नारखेडे, माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पुरी, डॉ. टी. ए. मोरे, डॉ. के. ई. लवांडे, डॉ. संजय सावंत, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशीद, संदीप राजपुरे, सुनल दळवी, सुस्मिता पवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर उपस्थित होते.

राज्यपाल बैस म्हणाले, की भारत हा जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. शेती करण्यासाठी लागणारी जनशक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान असूनही शेतीचे क्षेत्र घटत असल्याने अन्न उत्पादनात आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. पुढील काही वर्षांत भारताला जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे लक्ष्य पंतप्रधानांनी निर्धारित केल्याने कृषिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT