Tasagaon Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Tasagaon Farmer Protest : तासगावात शेतकऱ्यांचा पाण्यासाठी रास्ता रोको; पोलिसांची धरपकड, १० ते १२ शेतकऱ्यांना घेतले ताब्यात

Sangli Tasagaon Farmer Protest For Water : सांगलीसह राज्यात पाण्याची प्रश्न गंभीर झाला असून शेतकरी आता रस्त्यावर उतरला आहे. सांगलीच्या तासगावमध्ये शेतकऱ्यांनी पाण्यासाठी राजकारण चालू असल्याचा आरोप करताना आंदोलन केले.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : एकीकडे राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील पाणीदार असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मात्र पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून आता यावरून राजकारण चालू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच ताकारी सिंचन योजनेच्या पुनदी योजनेतुन पाणी मिळावे अशी मागणी असतानाही पाटबंधारे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून थेट आंदोलन केले. यामुळे पोलीसांनी १० ते १२ शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

सांगली जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील जत आणि तासगाव तालुक्यातील शेतीसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर जत तालूक्यात तीन लाखांच्यावर पशूधन संकटात सापडले आहे. महिला वर्गाला पाणी टंचाईमुळे पायपीट करावी लागत आहे. यामुळे पाण्यासाठी आता शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहे.

सावळजच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत

विसापूर-पुनदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडण्यात आले होते. मात्र ते पाणी अचानक बंद करण्यात आल्याने सावळजच्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच बिरणवाडी फाटा येथे आटपाडी-सांगली मार्गावर तासाभर रस्ता रोको करत जोरदार आंदोलन केले. यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तर दोन्हीकडे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलीसांमध्ये वादावादी झाली. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.

यावेळी शेतकऱ्यांनी सावळजला सोडण्यात येत असलेले पाणी का बंद केले असा सवाल केला. तर पाण्याच्या बाबतीत राजकारण केले जात असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच सोडलेले पाणी काही तासातच बंद करण्यात आल्यावरून पाटबंधारे अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांनी दुजाभावाचे आरोप केले आहेत.

पाटबंधारे अधिकारी हे नेत्यांच्या सांगण्यावरून पाणी बंद करतात असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तर येथे सुरू असणारे राजकारण खपवून घेतले जाणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे. तसेच तासगाव तालुक्यातील सावळजसह परिसरामध्ये ताकारी सिंचन योजनेच्या पुनदी योजनेतुन पाणी मिळावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manjara Dam: ‘नॅचरल’च्या वतीने मांजरा धरणातील पाण्याचे जलपूजन

Bioenergy Award: विस्मा तर्फे ‘श्री गुरुदत्त’ला उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादक पुरस्कार

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार: अध्यक्ष मानसिंगराव नाईक

Animal Feed : चारा-पाण्याचा प्रश्न खानदेशात सुटण्याचे संकेत

Cotton Crop Disease: लाखेगाव, अलीपुरातील कपाशी पिकावर ‘मर’ रोगाचा फटका

SCROLL FOR NEXT