Dhananjay Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay Munde : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा कांदा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, नाशिक जिल्ह्यात उभारणार 'हा' प्रकल्प

Aslam Abdul Shanedivan

Nashik News : निसर्गाच्या लहरीपणाचा राज्यातील शेतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे राज्यातील कांदा, कापूस, सोयाबिनसह इतर पिके आणि त्याच्या दरावर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात सध्या काहीच पडत नसल्याचे दिसत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचेही हाल प्रचंड होत आहेत. त्यांना कांदा पिकवण्यासाठी झालेला खर्चही मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी याबाबत घोषणा करताना, स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे म्हटलं आहे. त्यांनी याबाबत समाजमाध्यमावरून माहिती दिली आहे.

यावेळी मुंडे यांनी, नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे व्यापक हित व निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेत, कांद्याची भुकटी करण्याचा पथदर्शी प्रकल्प 'स्मार्ट' योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांनी हा निर्णय गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याचे म्हटलं आहे.

यावेळी स्मार्ट प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर, कृषी संचालक सुभाष नागरे, सहसंचालक ज्ञानेश्वर बोटे, कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड, कृषी संचालक दशरथ तांबाडे आदी उपस्थित होते.

कांदा उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या समस्यांबाबत नाशिक जिल्ह्यातील माजी विधान परिषद सदस्य जयंतराव जाधव यांनी मुंडे यांच्याकडे मागणी केली होती. तसेच त्यांनी याबाबत बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी स्मार्ट' योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कांद्याची भुकटी करण्याचा पथदर्शी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी ६०% ऐवजी ९०% पर्यंत अनुदान देण्यात यावा. यासाठी तसा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्याचे निर्देश विभागाला देण्यात आल्याचेही मुंडे यांनी म्हटलं आहे.

तसेच मुंडे यांनी, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यापक जनहितासाठी हा प्रकल्प असल्याचे म्हटलं आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात पिकणाऱ्या द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात निर्यात होते. पण येथे फूड टेस्टिंग लॅबोरेटरी नसल्याने अनेक वेळा शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. त्यांना निर्यातीच्या अटी व शर्ती पुर्ण करता येत नाहीत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात फूड टेस्टिंग लॅबोरेटरी करण्यासाठीही स्मार्ट योजनेतून अनुदान उपलब्ध करून देऊ असेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच यासाठी देखील जागतिक बँकेकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विभागाला दिले आहेत.

जयंतराव जाधव यांची कोणती मागणी

निसर्गाच्या लहरीपणा, पडणारे भाव आणि केंद्राच्या निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा फेकून द्यावा लागतो. त्यामुळेही त्यांचे आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी जिल्ह्यातील कांदा शेतकरी उत्पादक कंपनीकडून डीहायड्रेशन प्रोजेक्ट उभारल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. यासाठी कांद्याची भुकटी करता येऊ शकते. त्यामुळे येथे कांद्याची भुकटी करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी जयंतराव जाधव यांनी केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT