Crop Insurance
Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा कंपनीविरोधात अकोल्यात गुन्हा दाखल

Team Agrowon

Akola News : पीकविमा कंपन्यांच्या कारभाराविरुद्ध सामान्य शेतकऱ्यांत सातत्याने रोष व्यक्त होत असतो. अकोला जिल्ह्यात आता प्रशासनानेच विमा कंपनीकडून फसवणूक झाल्याची पोलिसात थेट तक्रार दिली आहे.

यावरून पोलिसांनी फसवणुकीच्या कलमासह विविध गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर बाबाराव इंगळे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. तीन कोटी ९५ लाख रुपयांची फसवणुकीचाही ठपका या तक्रारीत केला आहे.

या प्रकरणात आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीचे प्रतिनिधी प्रभास अरबाईन, कमलेश पाटील, नीलेश सोनोने, योगेश घाटवट, प्रफुल्ल गव्हाणे, महेश दांदळे, अमोल टाले, नरेंद्र बहाकार, आशिष भिसे, विकास शिंदे यांना आरोपी करण्यात आले आहे.

याबाबत डॉ. इंगळे शहरातील खदान पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले, की जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२-२३ साठी पंतप्रधान पीक विमा योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी आयसीआयसीआय लोंबर्ड कंपनीवर होती.

जिल्ह्यातील अकोला, अकोट, बार्शीटाकळी, मूर्तीजापूर, तेल्हारा, पातूर, बाळापूर या तालुक्यात कंपनीमार्फत खरिपात सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, कापूस आदी पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरवला होता.

योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विमाधारक शेतकऱ्यांचे विमा संरक्षित क्षेत्र बाधित झाल्यास क्षेत्राचा कृषी सहायक, नुकसानग्रस्त शेतकरी, विमा कंपनी प्रतिनिधीच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा केला जातो. पंचनामा अहवालावर सर्व उपस्थितांची स्वाक्षरी घेतली जाते. त्यानंतर हा पंचनामा ग्राह्य समजल्या जातो.

खरीप हंगामात पिकांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे व काढणीपश्‍चात झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी विहित कालमर्यादेत कंपनीला पूर्वसूचना दिल्या. नुकसान भरपाईबाबत दर आठवड्याला जिल्हास्तरावर बैठक होते.

अशाच एका बैठकीत बार्शीटाकळी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी काढणीपश्‍चात नुकसान भरपाईचे एकाही शेतकऱ्याचे सर्वेक्षण झालेले नसल्याचे निदर्शनात आणून दिले.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत केलेल्या पंचनाम्यावरील क्षेत्र व नुकसानीची टक्केवारी यामध्येदेखील कंपनीकडून खाडाखोड केल्याचे समोर आले. कंपनीच्या जिल्हा व तालुका प्रतिनिधींनी पंचनाम्यांवर खाडाखोड करून नुकसानीचे क्षेत्र व टक्केवारी कमी केलेली दिसून आली.

संगनमत करून फसवणूक

जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिलेल्या पोलिस तक्रारीत विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी संगनमत करून शेतकऱ्यांनी काढलेल्या पीकविम्याची विहित देय रक्कम कमी दिली.

त्यामुळे शेतकरी, राज्य व केंद्र शासनाची प्रथमदर्शनी तीन कोटी ९५ लाख ९ हजार १७७ रुपयांची खोटे पंचनामे तयार करून, त्यावर कृषी सहायकांच्या खोट्या स्वाक्षरी करून व नुकसान तसेच टक्केवारी कमी करून अपहार व फसवणूक केली आहे.

त्यामुळे आयसीआयसीआय लोम्बार्ड पीकविमा कंपनी व प्रतिनिधींविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी, असे तक्रारीत म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

Ethanol Production : केंद्राच्या निर्बंधांमुळे इथेनॉल निर्मितीत घट

Turmeric Seed : पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी थांबवली हळद बियाणे खरेदी

Agriculture Department : कृषी खात्याला गती देण्यासाठी ‘गेडाम पॅटर्न’

Mango Market : नागपूर-अमरावतीत स्थानिक आंबा वाणांचे दर दबावात

SCROLL FOR NEXT